Monday, May 6, 2024
HomeUncategorizedआता औरंगाबादहून दिल्लीसाठी तीन विमाने!

आता औरंगाबादहून दिल्लीसाठी तीन विमाने!

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय (Airport) विमानतळावरून शनिवारपासून सकाळच्या वेळेत (Delhi) दिल्लीसाठी विमानसेवा सुरू झाली. विमानातून पहिल्या दिवशी १४६ प्रवाशांनी सकाळीच दिल्ली गाठली. या विमानसेवेने सकाळी दिल्लीला गेल्यानंतर (Udaipur, Jaipur, Srinagar, Varanasi) उदयपूर, जयपूर, श्रीनगर, वाराणासी, चंडीगड आदी शहरांनाही कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणे शक्य होणार आहे. या नव्या विमानसेवेमुळे आठवड्यातून तीन दिवस दिल्लीसाठी दिवसभरात तीन विमानसेवा उपलब्ध राहणार आहेत.

- Advertisement -

इंडिगोकडून सकाळच्या वेळेत ही विमानसेवा सुरू करण्यात आली असून, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी ही विमानसेवा दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी दिल्लीहून २ प्रवासी औरंगाबादेत दाखल झाले. या तुलनेत औरंगाबादहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक राहिली. त्यामुळे दिल्लीसाठी सकाळच्या वेळेत विमानसेवा गरजेचे असल्याचे दिसते. हे विमान दिल्लीहून सकाळी ७.४० वाजता उड्डाण घेईल आणि औरंगाबादेत ९.३० वाजता दाखल होईल. त्यानंतर औरंगाबादहून सकाळी १० वाजता उड्डाण घेईल आणि ११.५० वाजता दिल्लीत दाखल होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या