Friday, May 3, 2024
Homeनगरवाळकी खून प्रकरणी तिघांना अटक

वाळकी खून प्रकरणी तिघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणात वाळकी (ता. नगर) येथील जावेद गणीभाई तांबोळी (वय 40) या तरुणाचा रविवारी खून झाला. याप्रकरणी त्याची पत्नी मिनाज जावेद तांबोळी (रा. वाळकी) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

- Advertisement -

बादल सलिम शेख, बाबा उस्मान शेख, सलिम उस्मान शेख, तय्यब बाबा शेख, आसिफ रसूल शेख, बानो आयुब शेख, मुन्नी सलिम शेख, बिशा बाबा शेख, शमशाद उस्मान शेख, नमु आयूब शेख, फैय्याज आयुब शेख (सर्व रा. वाळकी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी बादल शेख, बाबा शेख, सलिम शेख या तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मयत जावेद यांच्या मुलाने लावलेली सायकल बादल शेख याने लाथ मारून खाली पाडली. याचा जाब विचारण्यासाठी जावेद तांबोळी बादल शेख याच्याकडे गेले असता त्याच्यासह इतरांनी जावेद याला मारहाण करून त्यांचा खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या