Thursday, May 2, 2024
Homeजळगावकाय आहे 37 (3) कलम

काय आहे 37 (3) कलम

जळगाव – Jalgaon

आगामी सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याकरीता जमावबंदी आदेशान्वये कलम ३७ चेपोटकलम (३) लागू केले आहे, काय आहे हे कलम बघूया…

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात दि.२१ ऑगस्ट ते दि.2 सप्टेंबर, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचा आदेश राहुल पाटील, अप्पर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी दिला आहे.

सध्या संपुर्ण जगामध्ये कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर वाढतच असुन संसर्ग रोगामुळे जगामध्ये मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. जळगाव जिल्हयामध्ये सुध्दा कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन मृत्युचे प्रमाणसुध्दा वाढत चालले आहे. संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांनी विनाकारण गर्दी करु नये. नागरीकांनी मोठ मोठे सण उत्सव, पुण्यतिथी, जयंती, दिंडयांचे सामुदायीक कार्यक्रम घेऊ नये.

जिल्ह्यात 2 सप्टेंबरपर्यंत 37 (3) कलम लागू

काय आहे आदेश

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) मधील अधिकाराचा वापर करुन या आदेशान्वये पुढील कृत्यांना बंदी घालण्यात येते. यामध्ये…

अ) शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे,

ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे.

क) दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे,साधने इ.तयार, जमा करणे,आणि बरोबर नेणे,

ड) कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक, प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण,

इ) सार्वजनिक रित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे,

ई) सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक, इ.लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे.

वरील कलम 37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही.

त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस सबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणूका, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या