Friday, April 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहानगरपालिका निवडणूक - २०२६ : राज्यात भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध - प्रदेशाध्यक्ष...

महानगरपालिका निवडणूक – २०२६ : राज्यात भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात कल्याण – डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक १५ उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. या सर्व उमेदवारांचे चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर राज्यभरात भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.

कल्याण – डोंबिवली १५, पुणे २, पिंपरी चिंचवड २, पनवेल ६, भिवंडी ६, धुळे ४, जळगाव ६, अहिल्यानगर ४ असे एकूण भाजपचे ४४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ही बिनविरोध निवड म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार करत असलेल्या विकास कामांवर मतदारांचा असलेला विश्वास आहे. कारण मतदार भाजप उमेदवारालाच निवडून देणार याची खात्री विरोधी उमेदवारांनाही असल्यामुळे त्यांनी माघार घेतली, असे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे १९ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आज ऑरेज तर उद्या येलो आणि पाच तारखेला वादळी...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात मार्च महिन्यांच्या मध्यापासून बेमोसमी वादळी पावसाला सुरूवात झालेली असून येत्या रविवार (दि. 5) पर्यंत वादळी पावसासह गारपिठीची शक्यता कायम आहे. जिल्ह्यात...