Friday, May 3, 2024
Homeब्लॉगखऱ्या अर्थाने दिवाळी कशी साजरी करावी?

खऱ्या अर्थाने दिवाळी कशी साजरी करावी?

संत राजिन्दर सिंह जी महाराज

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. इतिहास पाहिल्यास कळते की, आजच्या दिवशी मोठमोठ्या संत-महात्म्यांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपण आपल्या घरांची साफ-सफाई करतो.

- Advertisement -

आपल्या घराची साफ-सफाई करताना आपण त्या वस्तूंना बाहेर काढतो ज्या आपल्याकरिता उपयुक्त नसतात. जर आपण आपल्या बरोबर बरेचसे अनावश्यक सामान बाळगत असू अथवा त्या वस्तूंकडे लक्ष देण्यात आपला वेळ वाया घालवत असू, ज्या आपणांस काही लाभ मिळवून देत नाही, तर याचा अर्थ असा आहे की, आपण असे जीवन जगत आहोत ज्यामध्ये आपले लक्ष जीवनाच्या उद्देशा प्रति नाही. अशा अवस्थेत आपल्या अंतरी सदैव एक संघर्ष चालू असतो, ज्यामध्ये एकीकडे आपले मन या बाह्य संसारात लिप्त राहू इच्छिते तर दुसरीकडे आपला आत्मा अंतरात परमात्म्याला प्राप्त करू इच्छितो. आपला आत्मा मनाद्वारे उत्पन्न झालेल्या मलिनतेला साफ करण्याचा प्रयत्न करत असतो. आपले मन- काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकाराच्या या ५ चोरांच्या मदतीने आपल्या अंतरी मलिनता निर्माण करते.

आपण स्वतःला तोपर्यंत शांत करू शकत नाही जोपर्यंत आपणांस कोण्यापूर्ण सद्गुरुंची मदत मिळत नाही. एक पूर्ण सद्गुरु आपली मदत कशी करतात? सर्वप्रथम ते आपणांस पवित्र नामाशी जोडतात. जेव्हा आपण ध्यानाभ्यासा दरम्यान आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण करतो, त्यामुळे आपले मन शांत होते. ज्यामुळे आपण आपल्या अंतरिच प्रभूच्या ज्योति व श्रुति अनुभव करतो. दुसरे असे की, सद्गुरू आपणांस हे ही समजावितात की, निष्काम सेवा करण्यानेच आपण मनाच्या दुष्प्रभावांपासुन मुक्तता मिळवु शकतो आणि मनावर नियंत्रण ठेवू शकतो, ज्यामुळे आपला आत्मा सुद्धा शुद्ध होतो. आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनातच आपण आपल्या जीवन योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यानेच खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण आपण साजरा करू शकतो.

सर्व धर्मांच्या मूलभूत शिकवणुकींत आपणास समजाविले आहे की, जशी आपण बाहेर दिवाळी साजरी करतो, ठीक त्याच प्रकारे आपण आपल्या अंतरी सुद्धा दिवाळी साजरी करू शकतो. दिवाळीच्या सणात आपण जे दिवे प्रज्वलित करतो आणि फटाके फोडतो ते सर्व आपल्या अंतरी विद्यमान प्रभूच्या ज्योति व श्रुति चे प्रतीक आहे.

चला तर! दिवाळीच्या या सणाला आपण सुद्धा बाह्य सफाई बरोबरच आपली आंतरिक सफाई करूया आणि सर्वात महत्त्वाचे की आपण ध्यानाभ्यासास वेळ देऊया, जेणेकरून आपणास प्रभूच्या ज्योति आणि श्रुतिचा अनुभव व्हावा, ज्या मुळे आपण खऱ्या अर्थाने दिवाळीचा हा सण साजरा करू शकू.

- Advertisment -

ताज्या बातम्या