Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याछत्रपती संभाजीराजेंच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची उडी फसली; राऊतांचा भाजपवर निशाणा

छत्रपती संभाजीराजेंच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची उडी फसली; राऊतांचा भाजपवर निशाणा

कोल्हापूर । Kolhapur

राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरून बराच खल पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम असलेल्या संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha elections) माघार घेताना याचे खापर शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर फोडले आहे.

तर दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) या घडामोडींसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जबाबदार धरले आहे. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा यावर कोल्हापूरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शाहू महाराजांमधील (Chhatrapati Shahu Maharaj) कौटुंबिक संबंध असून छत्रपती शाहू महाराज केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी आदरणीय आहेत.

तसेच शाहू महाराज यांनी काल जी भूमिका घेतली त्यानंतर मी इतकंच म्हणालो की कोल्हापूरच्या (Kolhapur) मातीत आजही प्रामाणिकपणा सत्य जीवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा जीवंत ठेवली.” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या मी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आहे आणि नक्कीच शाहू महाराजांना भेटून त्यांना अभिवादन करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला जसा छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर आहे, तसाच संभाजीराजेंविषयी प्रेम आहे. आम्हाला वादातून राजकारण करायचे नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसलेली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र, शाहू महाराजांनी भूमिका घेतल्याने त्यांची उडी फसली,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

राऊत पुढे बोलतांना म्हणाले की, छत्रपतींना समर्थक नसतात, संपूर्ण प्रजाच छत्रपतींची असते. शिवसेनेचे मन साफ आहे, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. शिवसेनेने आधीही भूमिका स्पष्ट केली होती की, शिवसेनेच्या दोन जागा आहेत. राज्यसभेत जायचे असेल तर तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घ्यावी. आम्ही तुम्हाला आमची मते देऊ, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या