Friday, May 3, 2024
Homeनगरदहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद

दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून सर्व सरकारी व खासगी शाळा 30 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज काढला.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रूग्ण संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. रोजच बाधितांंची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकार्‍यांना केल्या आहेत. त्यानुसार जमावबंदी, संचारबंदीचे आदेश यापूर्वीच काढण्यात आले आहे. मात्र शाळांबाबत निर्णय झालेला नव्हता. आज जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबत आदेश काढला. सर्व सरकारी व खासगी शाळा (दहावी व बारावीचे वर्ग वगळून) 30 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या