अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्रात पुढील काही तास हवामानाचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. जून महिन्याची सुरुवातच वादळी वार्यासह पावसाने होणार आहे. हवामान खात्याने राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.
- Advertisement -
हवामान विभागाने राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.




