Thursday, May 2, 2024
Homeनगरजमिनीच्या वादातून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

जमिनीच्या वादातून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar – जमिनीच्या कारणातून पाच जणांनी एका कुटुंबातील चौघांना लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी स्टेशनरोड परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न, विनयभंग आदी कलमान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिलेने फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मोहम्मद अली रईस शेख, जिशान रईस शेख, फैजल रईस शेख (तिघे भाऊ रा. इंपेरियल हॉटेल पाठीमागे, नगर), जुबेर शेख, सोहेल शेख (पूर्ण नावे माहिती नाही, रा. बुरूडगाव रोड, नगर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यातील फिर्यादी महिला रविवारी दुपारी शेतामध्ये शेळ्या चारत असताना यावेळी आरोपी तेथे आले.

- Advertisement -

आमची जमीन आम्हाला परत द्या, नाहीतर तुम्हाला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी महिलेचा विनयभंग करत त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी महिलेचा पती, सासू व दीर यांना देखील आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकी व जागेतील सीसीटीव्हीचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या