Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा बियाणे निर्यातीवर बंदी

कांदा बियाणे निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

परतीच्या पावसानें कांदा उत्पादक शेतकर्‍यांचें मोठें नुकसान झालें आहे.

- Advertisement -

त्यातच आधीपासून मुबलक व स्वस्त दरानें कांदा बियाणे उपलब्ध नसल्यानें शेतकर्‍यांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी केंद्र सरकारनें तत्काळ कांद्याच्या बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनीही ट्विट करत याची माहिती दिली.

राज्यासह कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा बियाणाचा तुटवडा जाणवत आहे. शेतकर्‍यांना स्थानिक पातळीवर स्वस्त दरात व मुबलक प्रमाणात कांदा बियाणें उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनें बियाणांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणीही शेतकर्‍यांकडून केली जात होती.

त्यातच परतीच्या पावसानें महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पिकांची प्रचंड नासाडी केली. यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांनाही मोठा फटका बसला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या