Tuesday, June 16, 2026
Homeदेश विदेशनागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीत आंदोलकांनी जाळल्या बस

नागरिकत्व दुरूस्ती कायदा: दिल्लीत आंदोलकांनी जाळल्या बस

नवी दिल्ली – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आसामसह ईशान्येकडील राज्यात हिंसाचाराचे उफाळलेला असून, आता हा आक्रोश नवी दिल्लीतही पोहचला आहे. रविवारी दुपारी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत तीन बस पेटवून दिल्या. या घटनेनंतर मथुरा रोड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

नागरिकत्व कायदा दुरूस्तीनंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे  विधेयक संसदेत मांडल्यानंतर याविरोधात रोष व्यक्त व्हायला लागला होता. कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...