Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल

आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल

मुंबई | Mumbai
गेल्या चार दिवसांपासून अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवर उमटू लागले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध चार आठवडे चालणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्ध संघर्षामुळे आता भारत दोन्ही देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सक्रीय झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक (+97150 365 4357) जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

US-Iran Conflict: मोठी बातमी! जागतिक तेलवाहतुकीला धोका; होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची कठोर भुमिका, नेमकी काय घडामोड घडली?

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मदतीसाठी व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...