मुंबई – राज्यात आज उपचारानंतर बरे झालेल्या 59 हजार 73 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 34 हजार 848 नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तसेच 960 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 47,67,053 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 89.2 टक्के इतके झाले आहे. तर, राज्यात आतापर्यंत 80 हजार 512 रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 टक्के इतका आहे.
- Advertisement -
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,08,39,404 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,44,063 (17.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,47,653 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,727 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 4,94,032 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.