Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारजिल्ह्यातील 10 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण

जिल्ह्यातील 10 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानांतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील 10 हजार 431 लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात घराची चावी देण्यात आली.

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आणि प्रकल्प संचालक प्रदीप लाटे उपस्थित होते.

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 10 हजार 431 नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. आज झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे वेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 लाभाथ्यांना घराच्या किल्ल्या देण्यात आल्या. तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरदेखील प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देण्यात आली.

महाआवास अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 9616 घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत एकूण 819 लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले.

आज राज्यपातळीवर एकाच दिवशी हा ई-गृहप्रवेश कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडला. राज्यात या अभियान काळात पूर्ण झालेल्या सुमारे 3 लाख 23 हजार घरांचा ताबा संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या