Friday, July 24, 2026
Homeनगरविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सावळीविहीर |वार्ताहर| Savalivihir

राहाता तालुक्यातील शिंगवे येथील मिलिंद जनार्दन जाधव (वय 42) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याने ऐन पोळा सणाचे दिवशी शिंगवे गावावर शोककळा पसरली. मिलिंद जाधव हे शेतकरी कुटुंबातील असून नेहमीप्रमाणे पोळा सण असल्याने सकाळपासून गायी धुणं व रंगरंगोटी करण्याचे कामात व्यस्त होते.

- Advertisement -

त्यांनी मारुती व म्हसोबा मंदिरात जाऊन देवांना नारळ फोडले व पूजा अर्चा करून घरी गेले. घराचे पाठीमागे गेले असता पावसाची संततधार सुरू असल्याने पोलवरील विजेच्या तारेचा प्रवाहास त्यांचा संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील कुटुंबियांनी एकच आरडाओरडा केला. त्यांना ताबडतोब शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यास मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...