नाशिक | Nashik (प्रतिनिधी)
आरोग्य विभागातील आणि गावातील आरोग्याशी निगडित ग्रामविकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीची परीक्षा २८ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे.
- Advertisement -
आरोग्य विभागातील १७ हजार पदे रिक्त असून त्यातील ५० टक्के पदे म्हणजेच साडेआठ हजार पदांच्या बढतीस मुभा देण्यात आल्यानंतर पदभरतीच्या परीक्षा याच महिन्यात पूर्ण होतील आणि मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पदस्थापनेचे आदेश दिले जाऊ शकतात.
आरोग्य विभागातील ही परीक्षा ओएमआर पद्धतीने घेतली जाणार असून त्याच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभागाने नेमलेल्या कंपनीकडून केले जात आहे.
आरोग्यसेवक आणि सेविका या पदांचाही यात समावेश आहे. साधारणत: पाच हजार पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाईल.