Saturday, August 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात 'एसआयआर'ला मुदतवाढ

राज्यात ‘एसआयआर’ला मुदतवाढ

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला (एसआयआर) १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ४ ऑगस्टपर्यंत राज्यात सरासरी ७५ टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई, ठाणेसारख्या भागात डिजिटायझेशनचे प्रमाण ५० टक्केंच्या आसपास आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. आयोगाने ही विनंती मान्य केली आहे.

आता सुधारित वेळापत्रकानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून गृहभेटींचा कालावधी ३० जून ते १७ ऑगस्ट असा राहणार आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचनेचे कामही १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून, त्यावरील सुनावणी तसेच निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केली जाईल. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

दर महिन्याला काहीतरी कार्यक्रम ठेवा, मुख्यमंत्री नाशिकला येतील आणि रस्त्यावरील खड्डे...

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारीने नाशिकला आले म्हणून शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले, अशी मिश्किल टोलेबाजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिकच्या...