Friday, May 3, 2024
Homeजळगावशेतकर्‍यांचे थकीत १५ कोटींसाठी आ.मंगेश चव्हाण यांची अलीबाग येथे धडक

शेतकर्‍यांचे थकीत १५ कोटींसाठी आ.मंगेश चव्हाण यांची अलीबाग येथे धडक

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

अलिबाग- गळीत हंगाम सन २०२०-२०२१ मध्ये चाळीसगाव तालुका व परिसरातील शेतकर्‍यांनी आपला ऊस मोठ्या प्रमाणात मालेगाव तालुक्यातील एस जे शुगर, रावळगाव येथे दिला होता. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून या शेकडो शेतकर्‍यांचे अंदाजे १५ कोटीच्या जवळपास ऊसाचे थकीत देयके रावळगाव येथील एस.जे.शुगर फॅक्टरी यांच्याकडे प्रलंबित आहेत. अनेकदा विनंती करून देखील कारखाना प्रशासनाने थकीत देयके देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकर्‍यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आपली अडचण मांडली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या अडचणीची तात्काळ दखल घेत, थेट अलिबाग येथे शेतकरी प्रतिनिधींसह आमदार भाई जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व देयके थकीत असणार्‍या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. आ.भाई जगताप यांनी येत्या १५ दिवसात शेतकर्‍यांचे थकीत बाकी देण्याचे आश्‍वासन यावेळी दिले आहे.

- Advertisement -

यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह भाजपाचे माजी प्रदेश पदाधिकारी उध्दवराव माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव बापू पाटील, टाकळी विकासोचे माजी चेअरमन रोहन सूर्यवंशी, माळशेवगे येथील शेतकरी राम पाटील आदी उपस्थित होते. भेटी दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी भाई जयंत पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची सद्यस्थिती अवगत केली.

शासनाच्या धोरणानुसार शेतकर्‍यांचे ऊसाचे एकुण प्रलंबित देयके व १८ टक्के व्याज यानुसार साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना तातडीने देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असतानाही आजतागायत रावळगाव कारखान्याने देयके अदा केलेले नाही. त्यामुळे ऊसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकर्यांसची शेती, शेतीची तयारी यामध्ये अडचणी येत आहेत.

अनेक शेतकर्‍यांच्या घरी लग्न आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मागील ३ वर्षांपासून सातत्याने होणारी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत हलाखीची झालेली असुन कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेकडो शेतकर्यां ची ऊस बिले साखर कारखान्याने थकविल्याने शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,

अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने कोणतीही विपरीत घटना घडू शकते, तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मलादेखील एस जे शुगर कारखान्याच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचे आमदार चव्हाण यांनी जयंत पाटील यांना सांगितले.

आमदार चव्हाण व शेतकरी प्रतिनिधी यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी तुमचे म्हणणे रास्त असून मीदेखील शेतकरी नेता आहे, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे शेतकर्‍यांचे देयके देण्यास उशीर झाला मात्र आपणा सर्वांनी चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची अवस्था मांडल्यानंतर मी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देणार असून येत्या १५ दिवसात शेतकर्‍यांचे थकीत देयके अदा करतो असे त्यांनी आश्वस्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या