Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिल्लीत अग्नितांडव; ८०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

दिल्लीत अग्नितांडव; ८०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

दिल्लीतील रोहिणी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे ८०० झोपड्यांना आग लागली. सर्व झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. ही घटना रोहिणी सेक्टर १७ मध्ये घडली. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला. तसेच, ५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली .

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी या मुद्द्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी पीडितांना तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २६ गाड्यांनी अथक परिश्रम घेतले. या दरम्यान, दोन मुलांचे मृतदेह सापडले, जे पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

ताज्या बातम्या

महिला टी-20 विश्वचषक २०२६ : भारताचा पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय

0
महिला टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेतील मोहिमेची दमदार सुरुवात केली. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या...