Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : पालकमंत्र्यांच्या ताफ्यात आता केवळ दोनच वाहनांचा वापर

Ahilyanagar : पालकमंत्र्यांच्या ताफ्यात आता केवळ दोनच वाहनांचा वापर

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या संदेशाला ना. विखे पाटील यांचा प्रतिसाद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक शासकीय खर्च कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाची व्यापक चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्याला प्रतिसाद दिला आहे. शासकीय ताफ्यातील अनावश्यक वाहनांची संख्या कमी करत त्यांनी आता आपल्या ताफ्यात केवळ दोनच वाहने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

पालकमंत्री विखे पाटील यांच्या या निर्णयामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून सामान्य जनतेतूनही या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी स्वतःपासून काटकसरीची सुरुवात करावी, असा संदेश या निर्णयातून दिला जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या देशभरात इंधन वापर कमी करणे, पर्यावरण संवर्धन आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत मोठे ताफे, अतिरिक्त वाहनांचा वापर आणि वाढता शासकीय खर्च यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

विशेष म्हणजे, अनेकदा राजकीय पदाधिकार्‍यांचे मोठे ताफे, त्यासाठी लागणारा इंधन खर्च आणि प्रशासनावर येणारा अतिरिक्त भार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असते. मात्र विखे पाटील यांनी स्वतःहून पुढाकार घेत ताफ्यात कपात केल्याने साधेपणा आणि जबाबदारीचे उदाहरण समोर आले आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली, इंधन बचत आणि सार्वजनिक पैशांचा योग्य वापर या तिन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेला फक्त संदेश देऊन चालत नाही, तर स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करणेही गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पालकमंत्री विखे पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांनीही अशा प्रकारे खर्चात बचत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. इंधन बचतीसह पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा निर्णय सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...