Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्याची चिंता मिटतेय !

जिल्ह्याची चिंता मिटतेय !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घट्ट विळखा मारुन असलेली कोरोनाची साखळी तुटत असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

मंगळवारी 14 पैकी 11 तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळुन न आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात एकूण 32 रुग्ण आढळुन आले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत आढळुन आलेल्या कोरोना बाधीतांची संख्या 53 हजार 842 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 10, जळगाव ग्रामीणमधील 00, भुसावळ येथील 09, अमळनेरातील 05 , चोपडा येथील 06, पाचोरा येथील 00, भडगावातील 00, धरणगाव 00, यावल 00, एरंडोल येथील 00, जामनेरातील 01, रावेर येथील 00, पारोळा येथील 00, चाळीसगावमधील 00, मुक्ताईनगरातील 00, बोदवड येथील 00, परजिल्ह्यातील 01 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 52 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 41 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 383 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात तर एकाचा मृत्यू गणपती हॉस्पिटल येथे झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये भुसावळ तालुक्यातील 82 वर्षीय पुरुष तर रावेर तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या