दैनिक देशदूत आणि केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात माती वाचवा हा कार्यक्रम होत आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव या कार्यक्रमात नाशिककरांना संबोधित करतील. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून माती वाचवणे का गरजेचे वाटते आहे? याबाबत हे शेतकरी सांगत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी…