अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नगरसह राज्यभर हजारो लोक अत्यावश्यक सेवेच्या माध्यामतून स्वत:ची जीवाची पर्वा न करता, जनतेची सेवा करत आहेत. यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सरकारी कर्मचारी, यासह अन्य शासकीय कर्मचार्यांचा समावेश आहे.
या सर्वाच्या कार्याला सलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतीसाद देण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता टाळ्या, थाळीनाद वाजून तसेच शंख फुकून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जिल्ह्यात मोठ्या व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी प्रशासनाचे आभार मानले.