अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरकर वाट पाहत असलेल्या कोकणातील आंब्याची पहिली पेटी नगरमध्ये दाखल झाली आहे. यंदा उशिराने दाखल झालेला आंबा महागल्याने नगरकरांसाठी आंबट ठरू पाहतोय, पण आवक वाढल्यानंतर मात्र आंब्यांचे दर कमी होतील अशी माहिती विक्रेत्याने दिली.
चोखंदळ ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी मार्केटला धाव घेण्यास सुरूवात केली आहे. फळांचा राजा असलेला आंबा यंदा नगरमध्ये उशिराने दाखल झाला आहे. अवकाळी पावसामुळे आवक कमी झाल्याने आंब्यांनी भाव खाल्ला आहे.