Thursday, May 2, 2024
Homeनगरकेंद्र सरकाराने सर्वसामान्यांना दुर्लक्षीत केलं- मधुकरराव नवले

केंद्र सरकाराने सर्वसामान्यांना दुर्लक्षीत केलं- मधुकरराव नवले

अकोले |प्रतिनिधी| Akole

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंत कधीही नव्हती, अशा परिस्थितीत हा अर्थसंकल्प तयार झाला आहे.

- Advertisement -

करोना संकटामुळे देशातील बळीराजाची अर्थव्यवस्था संकटात आहे. घसरलेला बाजार त्यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था रुळावर येण्याकरिता केवळ ऑपरेशन ग्रीन स्कीमची घोषणा पुरेशी नाही. उत्पादन खर्च कमी करण्याकरिता काही धोरण नाही तरीही सरकार शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट एमएसपी कसा देणार याबाबत स्पष्टता नाही.

कृषी उत्पादनाच्या निर्यातीबाबत सकारात्मकता दिसत नाही. करोनाच्या महामारीमुळे अनेक युवक बेरोजगार झालेत. त्यांचा देखील विचार सरकारने केलेला नाही. तत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने बळीराजा, ग्रामीण नागरिकांना व युवकांना दुर्लक्षित केले हे वास्तव आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या