Sunday, June 7, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra Rain Update : मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी; 'या' तारखेपासून पावसाचा जोर,...

Maharashtra Rain Update : मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी; ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर, हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन

मुंबई | Mumbai

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील (Sindhudurg and Ratnagiri Districts) काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

- Advertisement -

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान (Temperature) सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे

  • – आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये
  • – विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे

ताज्या बातम्या

Crime News : चोरट्यांची मध्यरात्री धाडसी चोरी! बिअर बारमधून लाखो रुपयांची...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील शेकटे फाटा परिसरातील न्यू शुभम बिअर बार अँड परमिट रूम येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत सुमारे एक लाख रुपयांचा...