Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासेंद्रीय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा : कृषीमंत्री भुसे

सेंद्रीय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा : कृषीमंत्री भुसे

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

महाराष्ट्रात सेंद्रीय शेतीची (Organic farming )वाटचाल आश्वासक आहे. सेंद्रीय उत्पादनात राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी दिली.

- Advertisement -

परंपरागत शेतीसोबतच कृषी विभागाकडून सेंद्रीय शेतीलाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रीय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे भुसे यांनी सांगितले. ‘सेंद्रीय व विषमुक्त शेती’ विषयावर अन्न व औषध प्रशासन, सहकार पणन, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि कृषी विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली. बैठकीत सेंद्रीय शेती धोरण, सेंद्रीय शेतमालाची विपणन व्यवस्था व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सेंद्रीय शेतीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक वचार केला येईल. अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा तसेच इतर अपारंपरिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी यासाठी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला, असे कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती : पाटील

सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार व पणन विभागाकडून गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती करुन उत्पादनांविषयी माहिती दिली जाईल, असे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. याशिवाय पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मसवर सेंद्रीय उत्पादने विक्रीसाठी ठेवता येतील. विक्री मेळावे, प्रदर्शन आणि इतर उपक्रमांतून सेंद्रीय उत्पादनांबाबत प्रबोधन करता येईल, असेही पाटील म्हणाले.

पशूंसाठी सेंद्रीय चारा उपयुक्त : केदार

राज्यातील शेतकर्‍यांना दुधाचे उत्तम उत्पादन मिळावे यासाठी पशूंना सेंद्रीय चारा दिल्यास उपयुक्त ठरेल. त्याबाबतचा प्रस्ताव विभागामार्फत तयार करण्याची तयारी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री सुनील केदार यांनी दाखवली आहे. यासाठी मोर्फाच्या सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. करोनानंतर प्रथिनयुक्त आहारांचे महत्त्व लोकांना पटल्याने दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. या विषयावर जनजागृती होत आहे, असे केदार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या