Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमCrime News : लग्नाच्या आमिषाने अत्याचार; युवतीची आत्महत्या

Crime News : लग्नाच्या आमिषाने अत्याचार; युवतीची आत्महत्या

तरूणासह चौघांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार देत मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून युवतीने (वय 23) आत्महत्या केल्याची घटना भिंगारच्या गवळीवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी मयत युवतीच्या वडिलांनी बुधवारी (1 ऑक्टोबर) सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

याप्रकरणी चौघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दीपक अशोक आव्हाड (रा. माणिकदौंडी रस्ता, पाथर्डी), दीपकची बहिण (नाव, पत्ता माहिती नाही), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शिरसाठ व बाबूजी नाकाडे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. पाथर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मयत युवतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक आव्हाड याने युवतीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. सदरचा प्रकार 1 सप्टेंबर 2024 पासून ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान घडला आहे. जेव्हा पीडित युवतीने लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा दीपक टाळाटाळ करू लागला.

त्याचवेळी, दीपकची बहीण, ज्ञानेश्वर शिरसाठ आणि बाबूजी नाकाडे यांनी देखील आम्ही तुमचे लग्न होऊ देणार नाही, असे म्हणून युवतीचा मानसिक छळ सुरू केला. हा सततचा शारीरिक आणि मानसिक त्रास असह्य झाल्याने युवतीने आपले जीवन संपवले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...