Maruti Chitampally passes away महाराष्ट्रातील निसर्ग आणि जंगलावरील कांदबऱ्यांनी घराघरात पोहचलेले साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते.
- Advertisement -





