Tuesday, May 5, 2026
HomeनाशिकNashik News: लोहशिंगवेत बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू; गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

Nashik News: लोहशिंगवेत बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू; गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

भगूर | वार्ताहर
भगूर जवळील लोहशिंगवे भागात असलेल्या मळे परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे. बिबट्याने येथील सुदाम मंगळू जुंद्रे (वय ३०, रा. मळे वस्ती, लोहशिंगवे) यांच्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हल्ला केला असून या हल्ल्यात सुदाम जुंद्रे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे पाच वाजता नारायण दत्तू जुंद्रे यांच्या घराजवळ सुदाम जुंद्रे मयत अवस्थेत आढळले. परिसरातील मंगेश पिराजी पाटोळे हा दररोजप्रमाणे पहाटे तीन वाजता भाजीपाला विक्रीसाठी जात असताना या रस्त्यावरून गेला होता. मात्र, परत येताना सुदाम जुंद्रे रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या पोट,गळा व मान या भागांवर बिबट्याने गंभीर जखमा केल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

सुदाम जुंद्रे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. घटनेनंतर पोलिस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे.

ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्या लोहशिंगवे परिसरात आठवड्यातून दोन वेळा बिबट्याचे हल्ले होत आहेत. सध्या १५ ते २० बिबट्यांचा वावर आहे. आम्ही दुग्ध व्यवसाय सोडून इतर काही साधनही नाही. शहरात हल्ला झाला तर सर्व यंत्रणा जागी होते, पण खेड्यांतील लोकांच्या जीवाला काही किंमत नाही का? वडनेरला लहान मुलांवर हल्ला झाला तेव्हा संपूर्ण प्रशासन सक्रिय झाले, मग आमच्यासाठी वेगळा न्याय का?”
ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत या प्रश्नावर ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत आम्ही सुदामच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. शासनाने आता तरी लक्ष घालून या भागातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा.”

दरम्यान, सलग होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे वनविभाग सध्या ग्रामस्थांच्या तीव्र रोषाचा केंद्रबिंदू बनला आहे. ग्रामीण भागात जनावरांबरोबरच माणसांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...