Monday, May 5, 2025
Home Blog Page 11

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान दहशतीत; PoK मधील पर्यटन स्थळ, मदरसे १० दिवसांसाठी केले बंद

0
मदरसे

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) भारत केव्हाही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमध्ये गेल्या आठवडाभरापासून यु्द्धाची तयारी सुरू आहे. पाकिस्तानने देशातंर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. सायरन बसवण्यात आले आहे. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच धार्मिक मदरसे १० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पाक व्याप्तचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक याने याबाबत संकेत दिले आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सुरक्षेसाठी नीलम खोरे आणि नियंत्रण रेषेजवळ पर्यटनाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पीओके हल्ल्याच्या भीतीने दहशतीत
भारत पीओके भागात केव्हाही हल्ला करु शकतो या भीतीने दहशतीत आहे. हल्ला झाल्यास जेवण, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. युद्ध झाल्यास आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी आपात्कालीन निधी तयार करण्यात आला आहे. जवळपा एक अब्ज रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर पाकव्याप्त परिसरातील सर्व हॉटेल, गेस्टहाऊसचा ताबा पाकिस्तानी लष्कराने घेतला आहे. या वास्तूंच्या मालकांकडून ते बळजबरीने घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आपण सैन्यासाठी या वस्तू सोडत असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात येत आहे.

मदरसे केले बंद
नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या आसपासच्या संवेदनशील भागात असलेले मदरसे १० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून त्यांना लक्ष्य करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि संवेदनशील परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरूनच परत पाठवण्यात आले. लिपा खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ जाण्यास पाकिस्तानी लष्कराने बंदी घातली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Rain Update: दिल्लीत अवकाळी पावसाचा हाहाकार; वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना, अनेकांचा मृत्यू, महाराष्ट्रालाही दिला अलर्ट

0
अवकाळी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली-यूपीमध्ये प्रत्येकी ४ आणि छत्तीसगडमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसासोबत जोरदार वादळीवाऱ्यामुळे झाडे पडण्याचे तसेच घरांचे छप्पर पडण्याच्या घटना दिल्लीत घडल्या आहेत. अशाच एका घटनेत, दिल्लीतील जफरपूर कला भागात एका घरावर झाड पडून या अपघातात ३ मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय, दिल्लीतील छावाला येथे एका घराचे छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहे. यामुळे पुढील चार दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेच्या दाबाचा पट्टा विदर्भातून जात असल्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात शुक्रवारी (ता. 2 मे) आणि शनिवारी (ता. 3 मे) हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, उत्तर भारतात हवामान विभागाने आज राजस्थानच्या ३० जिल्ह्यांमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारी यापूर्वी जयपूर, जैसलमेर, भिलवाडा आणि पाली येथे वादळासह पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाच्या मते, शुक्रवारी मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे गारपीट होऊ शकते. तर राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये धुळीचे वादळ येईल.

आज झालेल्या मुसळधार पावसानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सकाळपासून असे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अर्धी चाके पाण्यात बुडलेली दिसत आहेत. खरंतर, हवामान खात्याने दिल्लीच्या हवामानातील बदलाबाबत आधीच अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने सांगितले होते की, गुरुवारी संध्याकाळपासून दिल्लीत जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. गुरुवारी (१ मे) रात्री दिल्लीत पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी (२ मे) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या भागात जोरदार वारे वाहू लागले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रगती मैदानात ताशी ७८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे दिल्लीतील विविध भागात पाणी साचलेले पहायला मिळाले. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील द्वारका येथील खारखरी कालवा गावात जोरदार वाऱ्यामुळे ट्यूबवेल रूमवर एक कडुलिंबाचे झाड पडले. या अपघातात एका महिलेचा आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला, तर महिलेचा पती जखमी झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

0

अहिल्यानगर | प्रतिनिधी 

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६७ वर्षांचे होते. या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 

अरुणकाका जगताप यांचं पार्थिव दुपारी २.०० वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर ४. ०० वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते.

 

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

 

Maharashtra News : महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामाकाजात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खाती पिछाडीवर

0

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्यातील सरकारी कार्यालयांना (Government Offices) शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन तसेच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम जाहीर केली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन गुरुवारी,महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील गृह, सामान्य प्रशासन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, गृहनिर्माण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वित्त आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क या खात्यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळू शकले नाही.

भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत (Quality Council of India) या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा १० निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे. ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या सर्व ४८ विभागांनी १०० दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.  गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी (All Department) निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८ टक्के ) पूर्णतः साध्य केली आहेत. तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १०० टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे. तर आणखी १८ विभागांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.

या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी पुढीलप्रमाणे, कंसात टक्केवारी दिली आहे.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

ठाणे (९२.००), नागपूर (७५.८३), नाशिक (७४.७३), पुणे (७४.६७), वाशिम (७२.००)

सर्वोत्तम महापालिका आयुक्त

उल्हासनगर (६५.२१), पिंपरी-चिंचवड (६५.१३), पनवेल (६४.७३), नवी मुंबई (६४.५७)

सर्वोत्तम पोलिस आयुक्त

मीरा भाईंदर (६८.४९), ठाणे (६५.४९), मुंबई रेल्वे (६३.४५)

सर्वोत्तम विभागीय आयुक्त

कोकण (७५.४३), नाशिक (६२.२१), नागपूर (६२.१९)

सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक

कोकण (७८.६८), नांदेड (६९.८७)

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

महिला व बाल विकास (८०.००), सार्वजनिक बांधकाम विभाग (७७.९४), कृषी (६६.५४), ग्रामविकास (६३.५८), परिवहन व बंदरे (६२.२६)

सर्वोत्तम आयुक्त / संचालक

संचालक, तंत्र शिक्षण (७७.१३), आयुक्त, जमाबंदी (७२.६६), आदिवासी विकास (७२.४९), राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८), वैद्यकीय शिक्षण (६८.५३)

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

चंद्रपूर (६८.२९), कोल्हापूर (६२.४५), जळगाव (६०.६५), अकोला (६०.५८), नांदेड (५६.६६)

सर्वोत्तम पोलिस अधीक्षक

पालघर (७०.२१), जळगाव (६०.००), नागपूर ग्रामीण (६०.००), गोंदिया (५६.४९), सोलापूर ग्रामीण (५६.००)

या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.

नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी काम करा

या परिवर्तनशील आणि सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यानिमित्ताने केले आहे.

Nashik Crime : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक; ऐवज जप्त

0

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

घरफोडी (Burglars) करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना नाशिकरोड गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरी (Theif) करण्यात आलेले तीन लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. या चोरट्यानी नाशिक रोड व परिसरात तब्बल चार ठिकाणी घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे.

सिन्नरफाटा (Sinnar Phata) सिटी लिंक रोड परिसरात दोघे संशयास्पदरित्या फिरत आहेत असे समजल्यानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख व विशाल कुंवर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिली. सपोनि प्रविण सूर्यवंशी व पथकाने तत्काळ सिन्नरफाटा येथे धाव घेतली, सिटीलिंक बस डेपोजवळील रस्त्यावर एका रिक्षाजवळ दोन संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे साजिद हसन खान (वय २७, रा. अरिंगळे मळा, साईबाबा मंदिर जवळ, नाशिकरोड) आणि निखील चंद्रकांत पेटाप्ते (क्य २५, रा. विहितगाव, नाशिकरोड) अशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २.८९,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळाले ते पोलिसांनी जप्त केले. सर्व घरफोड्यांचा तपास पोलीस (Police) हवालदार विजय टेमगर करीत आहेत.

Nashik Crime : पोलीस कोठडीतून सराईताचे पलायन; मित्राची मदत, भद्रकाली पोलिसांकडून ताब्यात

0

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक (Arrested) केलेल्या सराईताने मंगळवारी (दि. २९) सायंकाळी अंमलदाराच्या हाताला हिसका देऊन भद्रकाली पोलीस ठाण्यातून (Bhadrakali Police Station) धूम ठोकली. या गंभीर प्रकारानंतर त्याचा शोध सुरु असताना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या मित्रास ताब्यात घेतल्यावर पोलिसांना आवश्यक माहिती मिळाली. यानंतर तांत्रिक विश्लेषणानुसार, भद्रकाली गुन्हेशोध पथकाने ४० किलोमीटर परिसर पिंजून काढत संशयित क्रिश किरण शिंदे (वय १९, रा. ५४ कॉर्टर्स, नानावली, जुने नाशिक) याला घटनेनंतर २४ तासांच्या आत इगतपुरीतून (Igatpuri) ताब्यात घेतले. शिंदे हा सराईत असून त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचे दोनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, याबाबत कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

काठे गल्लीतील (Kathe Galli) जयशंकर चौकातील संगम स्विट्सजवळ रविवारी (दि. २७) रात्री ८ वाजता अमोल हिरवे याच्यावर अज्ञातांनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दगडाने व कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, झोन एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहित यांच्या सूचनेने वरील गुन्ह्यातीस मारेकरी संशयित क्रिश व त्याच्या विधिसंघर्षित मित्रास गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने (दि. २८) ताब्यात घेऊन किंशला अटक केली होती.

या गुन्ह्याच्या पोलीस कोठडीदरम्यान (Police Custody) किश शिंदेला तपासकामी कोठडी बाहेर काढले असता त्याने अंमलदार तौसिफ नियाज सय्यद यांच्या हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनबाहेर उभा असलेला मित्र किरण युवराज परदेशी (रा. कथडा) याच्या मोपेडवर बसून पळ काढला. पथकाने सीसीटीव्ही फूटेज पडताळून परदेशीला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने क्रिश शिंदेला रात्री आङगाव शिवारातील निलगिरी बागेत सोडल्याचे सांगितले. त्यानंतर तो कुठे गेला, याची माहिती नसल्याचे सांगितले.

दरम्यान, पथकाने क्रिशचा ठावठिकाणा नसतांना मानवी कौशल्य व तांत्रिक तपास करून २४ तासांच्या आत इगतपुरी शिवारातून ताब्यात घेतले, तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते करीत आहेत. ही कारवाई हवालदार सतिष साळुंके, कय्यूम सय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश गुंद्रे, अंमलदार धनंजय हासे, जावेद शेख, गुरू गांगुर्डे, सागर निकुंभ, योगेश माळी, उत्तम खरपडे यांनी केली.

त्या गुन्ह्यातही वॉन्टेड

२४ सप्टेंबर २०२४ रोजी दु‌पारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुणे रोडवरील घंटी म्हसोबा मंदिरामागील प्रो-चिक्न दुकानासमोरील रोडवर हर्षल राजेंद्र देवरे याच्यावर संशयित लखन काशीद, क्रिश शिंदे व त्यांच्या सहा साथीदारांनी ठार मारण्यासाठी धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात २५ एप्रिल २०२५ रोजी अतिविलंबाने गुन्हा दाखल आहे होता. दरम्यान, या गुन्ह्यात मुख्य सराईत शुभम हरगावकरला ताब्यात घेण्यात आले असून क्रिष शिंदे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

Women’s T20 World Cup 2026 : महिला टी 20 विश्वचषकाची तारीख जाहीर, इंग्लंडमध्ये थरार

0

महिला टी 20 विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच 2026 ची तारीख (Women’s T20 World Cup 2026) अखेर जाहीर झाली आहे. याबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित करायची याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. परंतु अंतिम सामन्याबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती, परंतु आता आयसीसीनेही त्याची घोषणा केली आहे. आज गुरुवारी 1 मे रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या कार्यक्रमात ठिकाणे आणि तारखांची घोषणा करण्यात आली. चॅम्पियनशिपमध्ये 24 दिवसांत 33 सामने खेळवले जातील. पुढील वर्षी होणार्‍या महिला टी-20 वर्ल्ड कपचा (Women’s T20 World Cup 2026) अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे, असे आयसीसीने (ICC) जाहीर केले आहे. त्याचे यजमानपद इंग्लंडकडे आहे.

विशेष म्हणजे, आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळण्याची ही सलग तिसरी वेळ असणार आहे. ही स्पर्धा 12 जूनपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना 5 जुलै रोजी लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन, साउथहॅम्प्टनमधील हॅम्पशायर बाउल, लीड्समधील हेडिंग्ले, मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड, लंडनमधील केनिंग्टन ओव्हल आणि ब्रिस्टलमधील काउंटी ग्राउंड आणि इतर ठिकाणी ही स्पर्धा होईल. ज्यामध्ये 12 संघ असतील. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी महिला टी-20 विश्वचषकात आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. इतर संघांची निवड पात्रता फेरीतून केली जाईल.

विशेष म्हणजे याआधी गेल्या तीन वेळा जेव्हा जेव्हा आयसीसी स्पर्धेचा (ICC) अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला तेव्हा तेव्हा इंग्लंडचा संघ (England Team) चॅम्पियन बनला. 2017 मध्ये, महिला एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळला गेला, त्यानंतर इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनला. 2019 मध्ये, जेव्हा पुरुषांच्या एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना येथे खेळला गेला, तेव्हाही इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनला. अशा परिस्थितीत, पुढील वर्षी होणार्‍या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) इंग्लंडचा संघ पुन्हा विजेता बनेल का हे पाहणे खूप मनोरंजक असेल.

Nashik News : मृतदेह शोधासाठी काढल्या पाणवेली; रामकुंडात बीडचा तरूण बुडाला

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवदर्शनासाठी कुटुंबासह नाशिकच्या (Nashik) रामकुंड (Ramkund) येथे आलेल्या बीडमधील तरुणाचा आवर्तनाच्या प्रवाहित पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी (दि. २९) रात्री घडली. दरम्यान, बुधवारी दिवसभर अग्निशमन दलाने शोधमोहीम राबविली असता, बुडून बेपत्ता झालेल्या बालाजी रामभाऊ मुळे (वय २७, रा. राडी, ता. आंबेजोगई, जि. बीड) या तरुणाचा मृतदेह बुधवारी (दि. ३०) दुपारी दोन वाजता केवड़ीबन भागा-तील नदीपात्रातील पाणवेलीत अडकल्याचे आढळून आले. या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गंगापूर धरणातून गोदावरी नदीसह (Godavari River) कालवे, शेती व एकलहरे पॉवर स्टेशनसाठी १० ते ११ मेपर्यंत अतिरिक्त एक हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग टप्याटप्प्याने सुरु आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन तो प्रवाहित झाली आहे. दरम्यान, गोदापात्रात पाणवेली (Panveli) वाढल्या असून, प्रवाहित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून येत आहेत असे असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेल्या बालाजी मुळे व कुटुंबाने मंगळवारी वणी आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

त्यानंतर ते सायंकाळी सात वाजता पंचवटीतील (Panchvati) रामकुंड भागात आले. रात्री साडेसात ते आठ वाजता गोदाआरती झाल्यावर कुटुंबाने पाण्यात दिवे सोडले. याचवेळी पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने बालाजी येथील बाणेश्वर मंदिराजवळील पात्रात घसरून पडला, पाणी प्रवाहित असल्याने तो बुडाला. यानंतर कुटुंबाने आरडाओरड केली. यंत्रणेने शोधाशोध केली. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यातच, घटनेची माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी नाशिक येथील महेश शेळके यांना कळविली. महेश यांनी यंत्रणेशी समन्वय साधल्यावर शोधमोहिमेस वेग आला.

गोदावरी दुथडी वाहू लागली

गंगापूर धरणातून पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने सायंकाळी गोदाकाठी फिरणाऱ्यांनाही त्याचा आनंद मिळत आहे. धरणातून काही शेतीसाठी व काही एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी पाणी राखीव असत्ते. ते ठराविक वेळी सोडले जाते. ते राखीव एक हजार क्यूसेक पाणी काल सोडले गेल्याने गोदावरी वाहू लागली आहे. पाण्याअभावी येथे पाणवेली मोतथा प्रमाणात वाढल्या होत्या. आज त्या वाहत्या पाण्यामुळे वाहून गेल्या.

आता लोकांनाच उठाव करावा लागणार – जानी

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले गेलेले नाही. नागील दहा वर्षापासून ‘बहा-बिस्कीट’ समिती विकासाचा देखावा करीत आहे. नदीला मूर्ख बनवले, जनतेला मूर्ख बनवले, केवळ कागदपत्र रंगवली. पाणवेळी नदीमात्रात तयार होताराच कशा? मनपाकडे स्कीगर नाही, रोबोटिक यंत्र आणले होते तेही दिसत नाहै, पानवेली काढणार कशा? आतापर्यंत लोकांच्या आरोग्याचा प्रश् निर्माण होत होता. आता पा पाणवेलींमुळे लोकांच्या जीवावर बेतायला लागले आहे. त्यामुळे आता लोकांनाच उठाव करावा लागणार आहे.

देवांग जानी, गोदावरीप्रेमी

पोहायला जाणे बेतले?

घटनेनंतर, बुधवारी सकाळी आठ वाजता अधिशमनच्या पंचवटी उपकेंद्र व शिंगाडा तलाव येथील प्रत्येकी एका बंबासह जवानांनी स्बरी बोटीतून वगळ टाकून बालाजी मुळेच्या गृतदेहाचा शोध घेतला. मात्र, अपयश येत असतानाच अत्रिशगन दलाला तपोवनालगतच्या केवडीबनातील उतारावरील नदीपात्रात असलेल्या पाणवेलीत बालाजीच मृतदेह आढळून आला. तेव्हा बालाजीच्या अंगावर अंतरवखाव्यतिरिक्त इत्तर कपड़े नव्हते. त्यामुळे तो नोहण्याच्या बेतात पाण्यात उतरला होता, व्यातून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाल्याचे पोलीस व अग्रिशमन दलाने सांगितले. पंचवटी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन संजय कानडे, संजय जाधव, बाळासाहेब महोगे, अशोक सरोदे यांनी गोदाकाठ गाठून शोधकार्य केले तसेच शिंगाडा तलाव मुख्यालयातूनही रबरी बोट घेऊन फायस्मन उदय शिर्के, नितीन म्हस्के, किशोर पाटील, संजय आगलावे आणि प्रशिक्षणार्थी जवान यांनी जुन्या कन्नमवार पुल ते तपोवनपर्यंत शोधगोहीम राबविली.

मनपाचे पाणवेलीकडे दुर्लक्ष

गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्यासाठी वापरले जाणारे ट्रॅश स्किमर यंत्र पाच वर्षांनंतर स्मार्ट सिटीकडून महापालिकेला मिळाले आहे. मात्र, ते यंत्र सध्या काम करीत नसून त्याला ऑपरेटरच मिळालेला नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे. गोदापात्रातील पाणवेली काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ट्रॅश स्किमर यंत्र खरेदी केले होते. कंपनीने पाच वर्षे ते चालविण्यासह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एका कंपनीवर सोपवली होती. मध्यंतरी हे यंत्र स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेकडे हस्तांतरीत केले असून आधीच्या करारनाम्याची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेने पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. पाच वर्षे ते चालविणे आणि देखभाल-दुरुस्तीसाठी एकूण दोन कोटी २२ लाख १७ हजार ५४७ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ट्रॅश स्किमर यंत्राने आजवर गोदापात्र पूर्णपणे पाणवेलीच्या जोखडातून मुक्त झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे दुर्घटना देखील होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने आता तरी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मुद्दे

गाडगे महाराज पुलाखालील पात्रातून पाणवेली हटविल्या
दोन तासांत तब्बल एक ते दीड टन पाणवेली काढल्या
पुलाखालील रस्ता बॅरिकेडिंग करुन केला बंद
मृत वालाजी हा मेन्स पार्लरमध्ये काम करत होता
आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगा झाला पोरका

Ladki Bahin Yojana : एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

0

मुंबई | Mumbai

अक्षय्य तृतीयेचा सण बुधवार (30 एप्रिल) रोजी होता. याच दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अक्षय्य तृतीयाचा (Akshaya Tritiya) सण ही झाला तरी पण एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही. याचदरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Women and Child Development Minister Aditi Tatkare) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहिण योजना महायुतीची महत्वकांक्षी योजना आहे. एप्रिल महिन्याच हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच वितरित होणार आहे असे त्यांनी सांगितले. मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी? ते त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याच्या 1500 रुपयांसाठी आणखी काही वाट पहावी लागणार काय? असे दिसते आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली होती. निवडणुकीत आश्वासनं दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हा सवाल सातत्याने विचारला जातोय पण त्यावर नेत्यांनी, सरकारमधील मंत्र्यांनी अद्यापही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. लाडक्या बहिणीचे लक्ष एप्रिलचा हप्ताकडे लागले आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल कार्यक्रमादरम्यान आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या संबंधी वक्तव्य केल्याने महिलांचा उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Nashik Crime : वर्ग तीनचे सेवक लाचखोरीत दोषी; चालू वर्षी सापळ्यामधील पाच जणांना शिक्षा

0

नाशिक | भारत पगारे | Nashik

सन २०१३ ते २०१८ या कालावधीत विविध लाचखोरी प्रकरणांतील (Bribe Case) एसीबी (ACB) सापळ्यात अडकलेल्या ‘वर्ग तीन’ मधील पाच लाचखोरांना न्यायालयाने (Court) जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत दोषी ठरवले आहे. आरोपींना दंडासह कारवासाची शिक्षा ठोठावली असून अन्य प्रकरणांचे खटले पटलावर आहेत. विशेष म्हणजे या लाचखोरीत नगरविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या महापालिकांमधील लोकसेवक आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दररोज राज्यभरात सातहून अधिक सापळे रचतो. त्यातील बहुतांश सापळे यशस्वी होतात. एसीबीच्या नाशिक, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या आठ परिक्षेत्रांतून सापळे व अपसंपदेबाबत कारवाया केल्या जातात. त्यानुसार, केलेल्या कारवायांत महसूल व स्थानिक स्वराज्य संस्थांतील पाच लोकसेवक (Public Servant) व एक खासगी व्यक्तिस लाच स्विकारतांना पकडण्यात आले होते.

दोषसिद्धीसाठी सखोल तपासावर भर

लाचखोर तलाठी राठोडला एक लाख दहा हजार तर इतर आरोपींना दोन लाख २५ हजार असा तीन लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने दोषसिद्धी वाढवण्यासाठी सखोल तपास, साक्षीदार, तक्रारदारांचे जाबजबाब, मालमत्तेचे विवरण, आयओची भूमिका, सबळ पुराव्यांवर भर दिला जात आहे.

हे आहेत आरोपी

नागपूरमधील कुही तालुक्यातील मौजा तितूरचा तलाठी संजय नथ्थूजी राठोड (४७, रा. चंदशेषनगर, नागपूर) याला नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधिशांनी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चार वर्षे सश्रम कारावास व ६० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

मुंबई महापालिकेतील पर्यवेक्षी निरीक्षक संदीप शिवाजी नागरे याला न्यायाधिशांनी ५ मार्च २०२५ रोजी ३ वर्षे कैद व पन्नास हजारांचा दंड ठोठावला.

अशोक आनंदा रोकडे (प्रभारी मुकादम), नितीन दाजी जाधव (दुय्यम (दुय्यम अभियंता, मुंबई महापालिका) व खासगी व्यक्ती सज्जाद जब्बार खान यांना विशेष सत्र न्यायाधिशांनी प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजारांचा दंड २७ मार्च २०२५ रोजी ठोठावला.

लक्ष्मण धनू पवार या मुंबई महापालिकेतील भाडे पर्यवेक्षकास १६ एप्रिल २०२५ रोजी तीन वर्षे कारावास व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

दृष्टिक्षेप

चार दोषसिद्धी प्रकरणात सहा आरोपी
एक खासगी व्यक्ती व पाच सरकारी सेवक
शिक्षा मिळालेले सर्व आरोपी वर्ग तीनचे सेवक
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षा
वेळीच दोषारोपपत्रे, मालमत्ता तपास, साक्षीदारांमुळे शिक्षा