Thursday, April 9, 2026
Home Blog Page 12177

मनमाड : ५० खाटांच्या करोना उपचार केंद्राची निर्मिती

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मनमाड । प्रतिनिधी

मनमाड शहरात करोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. विषाणूचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य-प्रशासन यंत्रणेतर्फे प्रयत्न केले जात आहे. लवकरच शहरात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले जाईल, अशी माहिती आ. सुहास कांदे यांनी दिली.

दरम्यान, पालिकेसाठी देखील नव्या मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती झाली असून एक-दोन दिवसात ते रुजू होतील, असे आ. कांदे यांनी स्पष्ट केले.

शहारतील आययुडीपी भागात नवीन शॉपिंग सेंटरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आ. कांदे बोलत होते. शहरात रोज बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे ही चिंतेची बाब असली तरी नागरिकांनी घाबरून जावू नये करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवाय रुग्णांचे हाल होऊ नये, त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी रेल्वे हॉस्पिटल ताब्यात घेवून तेथे कोविंड केअर सेंटर सुरु केले जाणार असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

पालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेणकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंढे यांची नियुक्ती झालेली असून एक-दोन दिवसात ते रुजू होतील, असेही आ. कांदे यांनी सांगितले. आययुडीपी भागात नवे व्यापारी संकुल उभारले जात असून त्याच्या कामाचा दर्जा हा नक्कीच चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र पहिलवान परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साईनाथ गिडगे यांचा आ. कांदे ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हर्षद गद्रे यांनी तर संयोजन नगरसेवक महेंद्र शिरसाठ यानी केले. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, सुनील पाटील पाटील, कैलास गवळी, बब्बू कुरेशी, अमीन पटेल, फरहान सय्यद, गालिब शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

खरीप पिकांच्या पोषणासाठी रासायनिक खताची मात्रा देणे गरजेचे असतांना युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासकीय गोदामाबाहेर युरियासाठी शेतकर्‍यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र युरिया संपल्याचे अधिकार्‍यांतर्फे जाहीर करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी कॅम्परोडवर रास्तारोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषि अधिकारी व्यवहारे, पोलीस उपअधिक्षक रमाकांत नवले, कॅम्प पो.नि. पाटील आदी अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकर्‍यांची समजूत काढली. बफर स्टॉकमध्ये असलेल्या युरियाचे जोपर्यंत वाटप सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतल्याने अखेर प्रत्येक शेतकर्‍यास एक गोणी युरियाची देण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

निसर्ग वादळासह रोहिणी, मृग व आद्रा नक्षत्रात चांगली पर्जन्यवृष्टी झाल्याने यंदा तालुक्यात खरीप पिके जोमाने आली आहेत. तब्बल ७६ हजार ६३७ हेक्टर क्षेत्रावर ९३.२४ टक्के पेरणी झाली आहे. मका, बाजरी, कापूस, भुईमूग आदी नगदी पिकांना शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले आहे.आंतर मशागतीचे काम जवळपास अंतीम टप्प्यात असून पिकांची वाढ होत असल्याने रासायनिक खत युरिया पिकांना देणे गरजेचे झाले आहे. असे असतांना बाजारात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासकीय गोदामात २६६ रूपयांना मिळणारा युरिया खाजगी दुकानात ३५० ते ४०० रूपये मोजून देखील मिळत नसल्याने पिक वाचवायचे तरी कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

येथील कॅम्परोडवरील शासकीय गोदामात युरियाचे वाटप केले जात आहे. काळ पहाटे ५ वाजेपासून तालुक्यातील शेतकर्‍यांनी युरियासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र ११ वाजेच्या सुमारास युरिया संपल्याची नोटीस फलकावर लावली गेल्याने शेतकरी संतप्त झाले. याप्रकाराची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी गोदामावर धाव घेतली. गोदामात युरिया आहे मात्र पहाटेपासून रांगा लावून देखील दिला जात नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. यासंदर्भात ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला असता गोदामात बफर स्टॉक असल्याचे सांगण्यात येवून युरिया देण्यास नकार देण्यात आल्याने ठाकरेसह संतप्त शेतकर्‍यांनी कॅम्प रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. अखेर बफर स्टॉकमधील युरिया वाटप करण्याचा अधिकार्‍यांनी निर्णय घेतल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

कृषिमंत्र्यांच्या बदनामीचा कट

शेतकर्‍यांना बि-बियाणे तसेच रासायनिक खते मिळावीत यासाठी कृषीमंत्री दादा भुसे संपुर्ण राज्याचा दौरा करत काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करत आहेत. शेतीच्या बांधावर बि-बियाणे पोहचविण्याचे काम प्रथमच कृषिमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाले. तालुक्यात खतांची कमतरता भासू नये यासाठी दिडपटीने अधिक खतांचा पुरवठा वाढविण्यात आला होता. असे असतांना देखील कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात खतांसाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर बसून आंदोलनाची वेळ आली आहे. कृषीमंत्री बदनाम व्हावेत यासाठीच खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेल्याने याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना प्रशासनाकडून संधी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर व जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले होते. त्यावेळी जे मजूर गावी न जाता येथेच अडकून पडले त्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. या मजुरांना १२ ऑगस्टपर्यंत आपले नाव नोंदवता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात आले होते.

करोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक वाहतुकीची साधने तसेच वैयक्तिक वाहनांसाठी परराज्यात जाण्यासाठी परवानगी बंधनकारक केली आहे. सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेल्या नागरिकांना परवानगी घेऊन आपल्या खासगी वाहनातून घरी परतता येते. पण आपले वाहन नसलेल्या लोकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक मजूर या कालावधीमध्ये आपल्या मूळ गावापासून, घरापासून इतर ठिकाणी दूर अडकून पडले आहेत.

अनेक मजूर आजही आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. अशा अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी मूळ गावी परत जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नव्याने एक संधी उपलब्ध करून दिली आहे. १२ ऑगस्टपर्यंत या मजुरांना ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यानंतर त्यांना आपल्या मूळ गावी जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे अशा इच्छुक मजुरांनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

https:migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर 12 ऑगस्टपर्यंत नियमित रेल्वेसेवा स्थगित असल्याने तोपर्यंत अर्ज करता येईल, असे उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सांगितले.

समानीकरणाला फाटा यंदा झेडपीच्या बदल्यांचा शुभारंभ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

दरवर्षीच्या समानीकरणाच्या नियमाला छेद देत कालपासून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सामान्य प्रशासन विभागातील 40 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात 22 प्रशासकीय आणि 18 आपसी बदल्यांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ग्रामपंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या तर दुपारच्या सत्रात महिला बालकल्याण विभागातील विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांच्या बदल्या होणार आहेत.

करोनाच्या संकटामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने कालपासून सुरू करण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी यंदा बदलीपात्र कर्मचार्‍यांना मुख्यालयात न बोलवता तालुकास्तरावर गटविकास अधिकार्‍यांच्या अखत्यारित एकत्र करून बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती सुनील गडाख, मिरा शेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निखिलकुमार ओसवाल, संजय कदम, डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

दरवर्षी होणार्‍या समानिकरणाच्या नियमाला यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने छेद दिला आहे. कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये समानिकरण न झाल्याने अनेक तालुक्यात पडणारे रिक्त जागांचे खड्डे तसेच राहणार असून यात कर्मचार्‍यांची सोय होणार असली तरी प्रशासनाची गैरसोय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्स बदल्यांसाठी नगर तालुक्यातील कर्मचारी बोलविण्यात आले होते.

सामान्य प्रशासन विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये 22 प्रशासकीय आणि 18 आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. आपसी बदल्यांना टक्केवारीची अट नसल्याने त्या कितीही केल्या तरी त्याचा प्रशासनाच्या कामावर परिणाम होत नाही. मात्र, समानिकरणाच्या बदल्या न केल्याने अनेक कर्मचार्‍यांची गैरसोय होणार आहेे. तसेच त्याचा परिणाम तालुका पातळीवरील कामकाजावर होणार आहे.

सामान्य प्रशासनाच्या बदल्या

कक्ष अधिकारी 2 प्रशासकीय आणि 2 आपसी, कार्यालयीन अधीक्षक 4, वरिष्ठ सहाय्यक 2 आपसी, कनिष्ठ सहाय्यक 10 प्रशासकीय आणि 16 आपसी अशाप्रकारे 22 प्रशासकीय आणि 18 आपसी एकूण 40 कर्मचार्‍यांच्या सामान्य प्रशासन विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.

दरवर्षी प्रमाणे कर्मचार्‍यांची गैरसोय झाल्यास अथवा प्रशासनाने एखाद्याची गैरपध्दतीने सोय केल्यास त्या विरोधात तक्रारी सोबत झालेल्या बदल्यांच्या निर्णयाविरोधात अपील होत असतात. या अपिलावर समानधान न झाल्यास त्या विरोधात नाशिकपर्यंत पाठपुरावा सुरू असतो. यंदा देखील ही परंपरा कायम राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 23 बाधित

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहरासह तालुक्यात काल 23 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 125 वर पोहोचली आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 , सोशल क्लब येथे घेण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट करोना तपासणी अहवालात 101 अहवालापैकी 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच वॉर्ड नं. 1, महात्मा फुले हौसिंग सोसायटी परिसरातील तीन जणांसह वॉर्ड नं. 2 मधील दोघे पती-पत्नीसह एकजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

वॉर्ड नं. 7 मोरगे वस्ती येथील एक, चौथाणी हॉस्पिटलजवळ एक महिला, दत्तनगर येथील एक पुरुष, तालुक्यातील खंडाळा येथील एक जण मुंबई येथे नोकरीस होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या अंत्यविधीस खंडाळा येथून काहीजण गेले होते. ते परत आल्यानंतर 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यावेळी त्यांचे स्त्राव घेण्यात आले होते. काल त्याचा अहवाल आला. त्यात मयत झालेल्याची पत्नी तसेच त्यांचा जावई हे दोघे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

अन्य अहवाल आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भोकर येथील रुग्ण दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा मुलगा असून तो त्यांच्याबरोबर दवाखान्यात होता. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वॉर्ड नं. 4 मधील एकाच कुुटुंबातील चारजण असून वॉर्ड नं. 6 मधील एका प्रतिष्ठीत घरातील दोघे, तर अन्य दोघे असे चार, बेलापूर, इंदिरानगर, दत्तनगर येथील प्रत्येकी एक असे दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अनेकांनी कोणतीही लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

येथे सापडले रूग्ण

वॉर्ड नं. 1, वॉर्ड नं. 2-3, वॉर्ड नं. 4-4 वॉर्ड नं. 6-4, वॉर्ड नं. 7- 3

बेलापूर-1, दत्तनगर 1, इंदिरानगर 1.

काल एकूण 16 अहवाल निगेटिव्ह आले असून यात माजी नगराध्यक्ष यांचा समावेश आहे. आज 15 स्त्राव घेतले असून आजपर्यंत 626 स्त्राव घेण्यात आले आहेत. आंबेडकर वसतिगृहात 57 जण क्कारंटाईन असून संतलूक हॉस्पिटलमध्ये 47 जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण 125 जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर कोरोना उपचार केंद्रातून उपचार घेऊन 52 जण घरी परतले आहेत.

12 गटशिक्षणाधिकार्‍यांना नोटिसा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

मागील आठवड्यात ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 31 जुलैपूर्वी करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार 21 तारखेपर्यंत जिल्ह्यातील 14 गटशिक्षणाधिकार्‍यांनी तालुकानिहाय बदली पात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी पाठविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले होते. मात्र, जिल्ह्यातील शेवगाव आणि कर्जत वगळता अन्य तालुक्यांनी वेळेवर माहिती न सादर केल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित 12 गटशिक्षणाधिकार्‍यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला 15 जुलैला राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत आदेश मिळाले होते. यात यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने न करता त्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील बदलीपात्र शिक्षक यातून अधिकारप्राप्त शिक्षक आणि संवर्ग-1, संवर्ग-2 मध्ये बदलीसाठी पात्र असणार्‍या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेने चार दिवसांत म्हणजेच 21 जुलैला सायंकाळी पाचपर्यंत विहित नमुना आणि मुदतीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. ही माहिती वेळेवर सादर न करणार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता.

मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहिने गटशिक्षणाधिकार्‍यांना चार दिवसांपूर्वी पत्र पाठवून कोणत्या नमुन्यात माहिती भरून पाठवयाची आहे, याचा नमुना पाठवूनही जिल्ह्यातील शेवगाव आणि कर्जत वगळता अन्य गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळपर्यंत माहिती पाठविली नव्हती. यामुळे शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 12 गटशिक्षणाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर काल रात्री उशीरा शिक्षक बदलीची माहिती पाठविण्यात आल्याचे मॅसेज गटशिक्षणाधिकार्‍यांकडून पाठविण्यात येत होते. मात्र, पाच वाजता मुदत संपल्यानंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस धाडल्या आहेत.

आज जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागातील लिपीक संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. या बदलीच्या प्रक्रियेची तयारी करण्यात काल दिवसभर शिक्षणाधिकारी आणि त्यांचे कर्मचारी व्यस्त होते. आज कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर पुन्हा शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शिक्षण विभाग गुंतणार आहे.

मनोरुग्ण तरुणीवर नगरमध्ये अत्याचार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

वर्धा जिल्ह्यातील एका युवतीवर नगर शहरातील कल्याण रोडवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय बाबुराव कडू (रा. सिंहगड रोड, पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी फिर्याद दिली आहे.

अत्याचार झालेली युवती मुळची वर्धा जिल्ह्यातील आहे. ती मनोरुग्ण असल्याने वर्धा येथून निघून आली. तिचा संपर्क अभय कडू याच्याशी आला. कडू याने त्याच्या वाहनामध्ये बसून युवतीला पुणे येथे नेले. यानंतर तो तिला घेऊन पुणे येथून नगरमध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला. कल्याण रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ कडू याने युवतीवर त्याच्या वाहनामध्ये अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे या युवतीला तेथेच सोडून तो निघून गेला.

ही युवती सोमवारी नगर शहरामध्ये नग्न अवस्थेत फिरत असताना काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठानला देण्यात आली. एका रुग्णवाहिकेतून या युवतीला माउली प्रतिष्ठानमध्ये दाखल केले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू आहे.

याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरूण मुलाणी, सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांना मिळाली. त्यांनी शिंगवे येथे जाऊन युवतीची विचारणा केली. तिचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती शुद्धीवर नसल्याने पोलिसांचे पथक माघारी परतले.

माऊली प्रतिष्ठानचे डॉ. धामणे यांच्याकडून या युवतीवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना तिने मंगळवारी सर्व घटनाक्रम डॉ. धामणे यांना सांगितला. यानंतर डॉ. धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अभय कडू याला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करत आहेत.

म्हाळादेवीच्या शेतकर्‍यांनी निळवंडे कालव्याचे काम पाडले बंद

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अकोले|प्रतिनिधी|Akole

आपल्या विविध मागण्यांसाठी म्हाळादेवी ग्रामस्थांनी निळवंडे कालवे खोदाईचे सुरू असणारे काम काल दुपारी बंद पाडले. मागण्या मान्य होईपर्यंत कालव्याचे काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा म्हाळादेवीचे उपसरपंच व खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे यांनी दिला आहे.

शेतकर्‍यांच्या कालव्यामध्ये तुटलेल्या पाईपलाईन प्रशासन व ठेकेदार यांच्या खर्चातून जोडून देण्यात याव्यात, कालव्यावरील क्रॉसिंग होणार्‍या रस्त्यावर छोटे- छोटे पूल बांधावेत, ओढ्यावर सुरू असणार्‍या पुलासाठी कॉलम घेऊन ठेवले आहेत, गेली पाच वर्षांपासून ते काम बंद आहे ते काम जलदगतीने सुरू करावे, कालव्यामध्ये ज्या शेतकर्‍यांची घरे जाणार आहेत, त्यांना घरकुल योजनेद्वारे घर बांधून द्यावे, कालवेग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे आदी मागण्या म्हाळादेवीच्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कालव्याचे काम सुरू होऊ देणार नसल्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, मिनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक अध्यक्ष रवींद्र मालुंजकर, विनोद हांडे, राजेंद्र कुमकर, विकास बंगाळ, भाऊसाहेब आभाळे, भाऊसाहेब मेदगे, बाळासाहेब घोडके,भगवान करवर, सुभाष मालुंजकर, सतीश तिकांडे, दिलीप हासे, अनिल मुंढे, संजय हासे, कैलास मुंढे, सुभाष हासे, कैलास हासे, पवन हासे, रोहिदास वैष्णव, एकनाथ हासे, बंडू हासे, रामदास हासे, विठ्ठल हासे, बाळकृष्ण हासे, जनार्दन हासे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेत असताना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी निळवंडे कालव्याचे म्हाळादेवी येथे सुरू असलेले काम बंद पाडल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राहाता, साकुरीतील तिघांसह एक पोलीसही करोनाबधित

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता शहरात एका पोलीस कर्मचार्‍यासह आणखी एक असे दोघे जण करोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे.

राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला करोनाची लागण झाली तर शहरातील एका नागरिकालाही करोनाची लागण झाल्याने दोघेज़ण करोना बाधित झाल्याचे अहवाल खाजगी प्रयोग शाळेतून मिळाले आहेत. यातील पोलीस कर्मचारी हा लोणी येथील रहिवाशी असून त्याच्यावर लोणी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरा रुग्ण हा नाशिकमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून दोघांचेही अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांची होणार रँपीड अँटीजेन टेस्ट- राहाता पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला कर्मचारी बाधित झाल्याने पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांची सकाळी रॅपीड टेस्ट केली जाणार असून दुसर्‍या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सर्व नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे.

संगमनेरात नव्याने 37 करोना बाधित

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

तालुक्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून काल नव्याने 37 करोना बाधित आढळून आले. रॅपिड अँटीजेन चाचणीतून मोठ्या संख्येने करोना रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत तालुक्यात 426 करोना बाधित झाले आहेत तर 143 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

काल सकाळी शहरातील विद्यानगर येथील एका 48 वर्षीय इसमाचा मृत्यू करोना संक्रमणातून झाल्याचे समजले. त्यामुळे संगमनेरात खळबळ उडाली. मात्र स्थानिक प्रशासनाकडून रात्री उशीरापर्यंत याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सदर व्यक्तीला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातून नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता मात्र अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड म्हणून नोंदविला नसून संशयित म्हणून नोंदविण्यात आला आहे.

शहरातील मालदाड रोड येथील 31 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय मुलगी, अशोक चौक येथील 39 वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथील 40 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 5 वर्षीय मुलगी, 35 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी, 16 वर्षीय मुलगा, बाजारपेठ येथील 69 वर्षीय पुरुष, जेधे कॉलनी येथील 25 वर्षीय तरुण, विद्यानगर येथील 11 वर्षीय मुलगा, 24 वर्षीय तरुण, गणेशनगर येथील 46 वर्षीय पुरुष,

नांदुरी दुमाला येथील 47 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 35 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, जवळेकडलग येथील 33 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी, सुकेवाडी येथील 60 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 18 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 48 वर्षीय महिला, निमोण येथील 42 वर्षीय महिला, 60 वर्षीय, महिला, 30 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय मुलगी, 60 वर्षीय महिला यांचे पॉझिटिव्ह अहवाल काल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.