Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 12317

श्रीरामपूरकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांत संताप

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहराला गेल्या दीड महिन्यापासून बोरींगची चव असणारा पाणीपुरवठा होत असताना आता ज्या कालव्यामार्फत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये पाणी सोडले जाते त्या कालव्यामध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ खेळला जात आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कालव्यात साचलेली घाण व त्यातून निर्माण झालेले जीवाणू आणि विषाणू आणि त्यांना सोबत घेऊन होणारा पाण्याचा प्रवास यामुळे शहरातील जनतेचे आरोग्य बिघडले आहे. या दूषित पाण्यामुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे रोग वाढले आहेत. नगरपालिकेने याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कालव्यात जमा होणार्‍या या कचरा आणि घाणीचा बंदोबस्त करून याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवरा कालव्याच्या नॉर्दन ब्रँच येथून डावीकडे जाणार्‍या कालव्यामार्फत शहरातील साठवण तलावामध्ये पाणी घेतले जाते.

दहाव्याच्या ओट्यापासून गोंधवणी रोडवरील पुलापर्यंतच्या कालव्यामध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूकडील राहणारे नागरिक घरातील कचरा व इतर प्रकारची सर्व घाण थेट कालव्यातच टाकतात. सध्या कालव्याला पाणी नसले तरी पूर्वीच्या जमा असलेल्या पाण्यामध्ये शेवाळ साचले आहे. कचर्‍यामुळे तेथे जंतू व जिवाणू निर्माण झाले आहेत. मृत जनावरे, कुत्रे, कपडे, प्लॅस्टिक व इतर सर्व प्रकारचा कचरा कालव्याशेजारचे राहणारे लोक थेट कालव्यात टाकतात. तो कचरा साचून त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाटाला पाणी येण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई जरी केली जात असली तरी पाणी गेल्यानंतर जो कचरा जमा होतो तो साचल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन ती पाण्यामध्ये मिसळली जाते. यामुळे पाणी दूषित होते. सध्या शहराला केला जाणारा पाणीपुरवठा हा सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे. साठवण तलावामध्ये होणारा पाणीपुरवठा जास्तीत जास्त शुद्ध व्हावा यासाठी नॉर्दन ब्रँचपासून गोंधवणीच्या पुलापर्यंत कालव्याच्याकडेने भिंत उभारावी किंवा नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावापर्यंत वेगळी मोठी पाईपलाईन टाकून बंद नलिकेद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा हा जीवघेणा खेळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिण्याच्या पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी कार्यवाही व्हावी !
दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून नळाला येणार्‍या पाण्याची चव बदलली आहे. प्रत्येक भागातून याबाबत तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत याबाबत खुलासा करताना पाणी दूषित नसल्याचे जाहीर केलेले असले तरी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या क्लोरिन पावडरमुळे ही चव बदलल्याची चर्चा शहरात आहे. त्यासाठी सध्या वापरात असलेली क्लोरिन पावडर बदलण्याची व पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे.

शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना चूक झाली म्हणून कोपरगावात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (प्रतिनिधी) – शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शहरातील वाणी सोसायटीत राहणार्‍या पूजा संजय अरगडे या 17 वर्षीय तरुणीने आपली शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणावरून घरातील छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पीडित मुलीचे वडील नोकरीस असून ते कामावर गेले असताना घरी ही मुलगी व आई या दोघीच होत्या. आईने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना भ्रमणध्वनीवरून आपण बाजारात चाललो असून तुमचे कार्यालय बंद झाल्यावर तुम्ही मला बाजारात घेण्यासाठी या, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ते दोघे आपली कामे आटोपून घरी आले. घराचा दरवाजा त्यांना बंद आढळला. त्यांनी मुलीला हाक मारून प्रतिसादाची वाट पहिली मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही.

त्यामुळे त्यांनी तिच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पहिला. त्यालाही आतून प्रतिसाद आला नाही. दरम्यान या वसाहतीतील नागरिक जमा झाले. त्यांनी घराचे निरीक्षण केले असता एक दरवाजा उघडता येईल असा असल्याने त्यांनी तो उघडून आत डोकावून पहिले असता पूजा हिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे लक्षात आले. आतील घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांच्या समक्ष लोखंडी दरवाजाचे गज कापून पूजाला खाली उतरून उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ आर.पी. पुंड हे करीत आहेत.

विटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महापालिकेसह सर्वच यंत्रणा संभ्रमात ः नियमही कठोर करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अमरधाममध्ये विटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा, याबाबत अद्यापही महापालिका अंधारात आहे. अंत्यविधी झालेल्याची नोंद नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संबंधिताचे नातेवाईकही याबाबत शांत असल्याने गोंधळ वाढत आहे.

अमरधाममध्ये सोमवारी अंत्यविधी झाल्यानंतर एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढल्याचे समोर आले होते. त्यानंतर नवग्रह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विधीपूर्वक अंत्यविधी केला होता. मात्र या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत होता. महापालिकेची यंत्रणा अमरधाम सक्षम नसल्यानेच हा प्रकार ओढवल्याचा आरोप होत होता. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही या प्रकारानंतर लगेच बैठक घेऊन अमरधाम येथील सुविधांचा आढावा घेत वेगवेगळ्या सूचना केल्या. असे असले तरी अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा, त्यांचे नातेवाईक कोण, अमरधाममधील कर्मचार्‍यांना याची कोणतीच माहिती कशी नाही, मृतदेह अर्धवट अवस्थेत बाहेर काढणारे कुत्रेच होते की अन्य काही कारणामुळे तो बाहेर निघाला असे अनेक प्रश्‍न विचारले जात आहेत.

मात्र हा प्रकार घडल्यानंतर आता गार्डन, आरोग्य आणि बांधकाम विभागाचे प्रत्येकी तीन कर्मचारी अतिरिक्त तेथे नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच अमरधामच्या संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीचेही आदेश दिले असून, त्यानुसार इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या प्रत्येकाची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे करणार?
यापुढे अंत्यविधीसाठी पार्थिव तेथे आल्यानंतर संबंधित नातेवाईकांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्याचा विचार महापालिकेचा आहे. प्रमाणपत्र आणि नगरसेवकाचे पत्र यापैकी एक किंवा दोन्हीही बंधनकारक करावे का, असा विचार सुरू आहे. तसेच तेथील कामकाज खासगी संस्थेकडे सोपविण्याचाही विचार आहे. नोंदीसह सर्व जबाबदारी त्या संस्थेवर सोपविण्याचाही एक विचार आहे.

सोयाबीन पळविणार्‍या दोघांना अटक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – मार्केटयार्ड येथून धुळे येथे नेण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला नऊ लाख 51 हजारांचा सोयाबीन ट्रक चालकाने मालकाच्या साथीने गायब केल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगरच्या व्यापाराची मोठी फसवणूक करणार्‍या परराज्यातील दोघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. काशिद रशिद शेख व रियाज रज्जाक लोहार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यापारी भगवानदास गुलचंद गांधी यांनी मार्केटयार्ड येथून 230 क्विंटल सोयाबीन ट्रक (क्र. एमपी- 09 एचएच- 9919) मध्ये भरून दिले होते. ट्रक चालक मुकेश कुमार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) याला सोयाबीन धुळे येथील अ‍ॅक्ट्रक्शन कंपनीत पोहोच करण्यास सांगितले होते. त्याने ते गायब केले. याप्रकरणी गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोतवाली पोलिसांनी ट्रक चालकाचा मध्यप्रदेश येथे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही.

ट्रकचा मालक बबलू ऊर्फ काशिद रशिद शेख असल्याचे समजताच त्याला सैंधवा (जि. बडवणी, मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले. त्याने ट्रक चालक मुकेश कुमार याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. मध्यस्थी करून सोयाबीन विकणारा रियाज रज्जाक लाहोर यालाही कोतवाली पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून सहा लाखांचे 15 टन सोयबीन व 12 लाखांचा ट्रक असा 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस नाईक अण्णा बर्डे, राहुल शेळके, राजू शेख यांनी केली.

थकित कर वसुलीसाठी आयुक्त द्विवेदी आक्रमक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मोठे थकबाकीदार झळकणार फ्लेक्सवर, नळजोडही तोडण्यात येणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले असून, थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्यापासून, मालमत्ता जप्त करणे, नळकनेक्शन तोडणे आदी कारवाई करण्याचे आदेश दिले.

द्विवेदी यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेतली. यामध्ये थकित कराबाबत त्यांनी आढावा घेतला. सुमारे 282 कोटींची थकित बाकी कागदोपत्री दिसत असली तरी न्यायालयीन वादात अडकलेली थकित रक्कमही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे न्यायालयीन अडचण येणार नाही, अशी थकित रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले. आतापर्यंत 36 कोटींची वसुली झालेली असून, पुढील मार्चअखेरपर्यंत 38 कोटींचे उद्दिष्ट द्विवेदी यांनी प्रभाग समिती कार्यालयांना दिले.

वसुलीची मोहीम कठोरपणे राबविताना त्यासाठी लोकांना माहिती मिळावी म्हणून ध्वनिक्षेपकावरून अनाउन्समेंट करण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी काही रीक्षा आणि सध्या महापालिकेच्या दारोदार फिरत असलेल्या घंटागाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांची यादी शहरात चौकाचौकांत फ्लेक्सद्वारे झळकवतानाच ही यादी चित्रपटगृहामध्येही झळकविण्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील चार प्रभाग समित्यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सावेडी प्रभाग समितीला बारा कोटी, बुरूडगाव प्रभाग समितीला दहा कोटी, शहर व झेंडीगेट प्रभाग समितीला प्रत्येकी आठ कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत इतर कामे करतानाच वसुलीवर प्रभाग अधिकार्‍यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्याचेही सांगण्यात आले आहे.

शास्तीमाफी यावर्षी नाहीच
कर वसुलीची मोहीम तीव्र झाल्यानंतर नगरसेवकांतून लगेच शास्ती माफीचा आग्रह धरला जातो. शास्तीमध्ये माफी देण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे. चालू आर्थिक वर्षात ही माफी मिळालेली नाही. त्यामुळे आता ही माफी मिळावी, असा आग्रह नगरसेवकांचा असतो. त्यानुसार मागणीचे पत्रकही निघू लागले आहेत. मात्र यापूर्वी अनेकदा शास्तीमाफी देऊनही मोठ्या थकबाकीदारांनी त्याचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासन यावर्षी शास्ती माफी देण्याच्या मानसिकतेत नाही. आगामी काळात यासाठी किती दबाव येतो, यावरच शास्तीमाफीचा निर्णय अवलंबून असेल.

राज्यात न्यायाधीशांसह इतर 1386 पदे रिक्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

महाराष्ट्रातील न्यायालयांमधील न्यायाधीश आणि त्यांना सहाय्य करणारे इतर 1386 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.  प्रशासकीय व नागरिकांच्या सोयीसाठी ही पदे लवकरात लवकर भरावेत, अशी मागणी  हॅपी रिसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.आशीष एस.जाधव यांनी पत्रकार परिषदेत दुपारी दिली.  याबाबतचे निवेदन मुुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

ही पत्रकार परिषद मंगळवारी दुपारी एका हॉटेलमध्ये झाली. यासंदर्भातील माहिती प्रा.डॉ.आशिष एस.जाधव यांनी माहितीच्या आधारे मिळवली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथील न्यायालयांमध्ये न्यायाधिशांची 27 पदे रिक्त आहेत.

त्यांना कामकाजात सहाय्यभूत ठरतील, असे संदर्भ क्र.1 (बी) नुसार मुंबई हाय कोर्टात ग्रुप ए, बी, सी, डी.ची अनुक्रमे 29, 9, 119, 22 अशी एकूण 179 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत.

नागपूर खंडपीठात ग्रुप ए, बी, सी, डी. अनुक्रमे 3, 11, 87, 39 अशी एकूण 140 पदे रिक्त आहेत. औरंगाबाद खंडपीठात ग्रुप ए, बी, सी, डी. या वर्गातील अनुक्रमे 2, 3, 76, 18 अशी एकूण 99 पदे रिक्त आहेत.

तसेच महाराष्ट्रात जिल्हा न्यायालयांमधील व इतरत्र न्यायालयात वर्ग दोन ते चारचे 941 पदे रिक्त आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात न्यायाधिशांसह इतर असे एकूण 1386 पदे रिक्त असल्याचे प्रा.डॉ.जाधव यांनी सांगितले.

तसेच संदर्भ क्र.एक सी नुसार राज्यात सुमारे एक लाख 25 हजार 108 पेक्षा अधिक न्यायालयीन दावे आणि खटले न्यायालयांमध्ये न्यायप्रवीष्ठ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला अश्पाक पिंजारी, डॉ.शरीफ शेख, अ‍ॅड.हरिहर पाटील, ललित शर्मा, उमाकांत वाणी आदी उपस्थित होते.

अवैध डांबर कारखाने उद्ध्वस्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे  – 

तालुक्यातील दिवाणमळा, अनकवाडीसह मुकटी परिसरात आज भल्या पहाटे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पथकासह छापा टाकून अवैध डांबर कारखाने उध्वस्त केले.

घटनास्थळाहुन दोन ट्रक, पांढर्‍या रंगाची पावडर, रिकामे ड्रम, एक टँकर, तीन मिक्सर मशीन असे लाखोंचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी 8 ते 10 जणांना संशयीतांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

या परिसरातून वरील साहित्याच्या माध्यमातून डांबर बनवून ते काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा पोलिसांना संशय आहे़ दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे धाब दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पहाटे धाडसत्र  राबवित धुळे तालुक्यातील दिवाणमळा, मुकटी, अनकवाडी गावाजवळील काळे डांबर बनविण्याचे कारखाने उध्वस्त केले़ दिवाणमळा परिसरात कारवाई करुन डांबर बनविण्याचे साहित्य, एक मिक्सर, मशीन जप्त करण्यात आले़ तर अनकवाडी गावाजवळील जंगलात एक टँकर, रिकामे ड्रम, दोन ट्रक पांढर्‍या रंगाची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले़ मुकटी परिसरातही डांबर बनविण्याचा कारखाना आढळून आला आहे़ .

या तिनही ठिकाणाहून डांबर बनविण्याचे साहित्य आढळून आले असून तो सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे़  तसेच 8 ते 10 जणांना संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे़

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 लाख रुपयांचा निधी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नंदुरबार  – 

नंदुरबार तालुका विधायक समिती शैक्षणिक परिवार व रघुवंशी परिवाराच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 लाख रुपयांचा निधी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सुपुर्त केला.

नंदुरबार  राज्याचे नुतन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांना गोरगरीब जनतेला मदत व्हावी म्हणून तसेच संकटात सापडलेल्या, शेतकर्‍याला आर्थिक मदत करता यावी म्हणून व गरजु लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मुख्यमंत्री वेळोवेळी मदत करीत असतात.

त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपला काही सहभाग असावा या उदात्त हेतु ठेवत मदत केली पाहिजे या भावनेतुन नंदुरबार तालुका विधायक समिती शैक्षणिक परिवार व रघुवंशी कुटूंबाच्या वतीने आज नुतन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना 15 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माजी. आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी आ.अब्दुल सत्तार,आ.किशोर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, उपजिल्हा प्रमुख देवेंद्र जैन उपस्थितीत होते.

‘त्या’ पाच नगरसेवकांना नोटिसा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

घरकुल घोटाळ्यातील दोषी असलेल्या 5 ते 6 नगरसेवकांना 17 रोजी मनपात हजर राहण्याच्या नोटिसा प्रशासनाने काढल्या आहेत.

घरकुल घोटाळ्यात दोषी ठरलेल्या या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक लता भोईटे, स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे,  नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक दत्तात्रय कोळी यांचा सामावेश आहे.

या सर्वांना 14 दिवसाची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली  आहे. या नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 17 रोजी हजर राहावे लागणार आहे. घरकुल घोटाळ्याचा निकाल 31 ऑगस्ट रोजी लागला होता.

यात सुरेशदादा जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह 48 आजी माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर काही नगरसेवक दोन महिन्यांनी जामिनावर सुटले. प्रत्येक नगरसेवकास दंडाची रक्कम भरावी लागली होती.

त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सर्व नगरसेवकांना जामीन झाला आहे. मात्र यातील 5 ते 6 नगरसेवक आताही निवडून आलेले आहेत. हे नगरसेवक दोषी ठरविण्यात आले आहे.

मात्र त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? याबाबत केवळ चर्चा होती. आता मात्र या नगरसेवकांना 17 रोजी मनपात हजर राहण्याबाबत नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

औरंगपूर येथे चोरी : दोन लाखांचा ऐवज लंपास

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शहादा । ता.प्र.

शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील शेतकर्‍याच्या घरातून चोरट्यांनी सुमारे 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.या चोरीमुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,औरंगपूर ता.शहादा येथील शेतकरी नामदेव गोविंदा पाटील यांच्या राहत्या घराचे धाब्यावरील दरवाज्याचे दार उघडून चोरट्यांनी पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडले.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरात ठेवलेल्या कपाटातून 90 हजार रुपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बांगड्यांची जोडी, 54 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन , 48 हजार रुपये रोख असा 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी नामदेव गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरध्द भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सेपानि भदाणे करीत आहेत.