Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 12318

Police seize 170 rickshaws without permit

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

Nashik: The city police has undertaken a drive since November 25 against errant auto-rickshaw drivers to discipline traffic in the city and to prevent financial loot of passengers. So far, action has been taken against around 1,470 auto rickshaws and a fine of Rs 3.60 lakh has been recovered. A total of 170 auto rickshaws which have no permits have been seized.

Over 23,000 auto rickshaws are running in the city daily, however, it is coming to light that out of them, 10,000 auto rickshaws have no permit. City police are trying to trace out whether auto rickshaws in such numbers are running in the city or not, their routes and the area which has the highest number of rickshaws.

Police are taking action against those auto rickshaw drivers which are not charging a fare as per meter, to carry additional passengers than the limit of three passengers, no uniform and batch, carrying of passengers after illegal agreement with a private company and no documents.

With the start of police action, many auto rickshaws have disappeared from the roads. City police changed the timing and places to take action for a week. They have started the second phase of the action. It is necessary that there should be an audit of auto rickshaws in the city transparently.

A work regarding this has been given to personnel in police chowkis in the city. They are taking note of auto rickshaw halts in their area, number of auto rickshaws, owner and driver, whether auto rickshaws run on the meter or not and the routes of share-a-rickshaw. This information will be collected jointly. This will be immensely benefitted in future, Commissioner of Police Vishwas Nangre Patil has clarified.

Sting operation at 9 places
It is important to charge a fare as per meter and auto rickshaw drivers should provide this facility if it is demanded, however, they are charging an excessive fare in the name of share-a-rickshaw. To curb this, police have so far conducted sting operation at 9 places.

Police in civil dress demanded to charge a fare as per meter, but they opposed it. Action against these auto rickshaw drivers was taken as per rules, police have clarified.
Boards erected at 200 rickshaw halts

The police department has issued temporary notifications for 263 rickshaw halts in the city. Of them, boards have been erected at 2000 halts and the number of auto rickshaws has been mentioned on them. However, it is mandatory that representative of auto rickshaw unions should have information of their numbers halt wise, senior police and RTO officials have made it clear.

Disabled demanding justice on International PWD Day

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

Nashik: On International Day of Person with Disability (PWD) around 12 to 13 PWD of Nashik city have gone on hunger strike against the Nashik Municipal Corporation. The disables have alleged that the Social Welfare Department of NMC has not taken any action against their application under NMC’s scheme for disabled.

The NMC officials have said that there were irregularities in some applications and that is why the corporation rejected them.  The agitators have said that they have applied for the scheme number 2 of NMC’s social welfare department.

The scheme allows corporation to divert the fund which is not used in this scheme and provide the fund to PWD candidate to set up their own business. The agitators have alleged that the corporation has rejected their application though they have fulfilled all the terms and conditions of the scheme.

The agitator, Atul Bagul said, “I have applied for the scheme on October 10, 2018. All the required documents, conditions and regulations were fulfilled by me, but still, nothing has happened. Every time visit NMC the officials gave various reasons as commissioner has changed, he is on holiday, deputy commissioner got retired and whatever reason they can site, they have given to avoid me.”

On the other hand the deputy commissioner of Social Welfare Department of NMC, Archana Tambe, said, “We already told them on Friday the process is going on. We had meeting with the committee of social welfare. Within a week the decision about the pending application if they are as per the rules and regulations of the scheme, will be accepted. It will take time for the process they should understand that.”

It is expected that the corporation will soon take some steps for the PWD’s in City. The agitators have said that they will stage more serious agitation if their demands are not fulfilled.

Nashikites go Ga Ga for Holidays this winter

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

Beach sides, warm places on Nashikites Radar in holiday season

Prashant Nikale

NASHIK: The gorgeous winter of Nashik is blooming slowly and the Nashikites are packing bags for enjoying beaches. The holiday season has started everywhere after the heavy monsoon. The weddings mahurats have also started after Diwali and couples are choosing various domestic as well as international holiday places for their honeymoon.

Datta Bhalerao, President of Travel Agents Association of Nashik (TAAN) informed, “Nashikites are choosing warm places this winter. The beach sides are also turning out to be preferred choice. The travelers have chosen Kerala as their favourite destination this year for domestic holiday travel.

As usual Dubai Festival also has takers with Dubai turining out to be international holiday destination for many. However, in the present situation, business has come down by five to ten per cent this year.” He also informed that the bookings for the domestic as well as for international holiday packages have come down.

In interstate vacation places like Matheran, Mahabaleshwar, Lonawala, and as well other hill stations are in demand. Southern India has high demand with Andaman Nicobar, Rameshwaram and beach sides being favourites. The international tourist hotspots for Nashikites in this season are Dubai, Myanmar, Mauritius, Singapore and most of the South East Asian block.

Nashikites are preferring warm places and beach sites, this winter. The bookings for domestic, international holiday packages are around 60 to 65 percent full this year.

 Nashik in tourist books
While Nashikites are looking to a destination outside the city, there are many tourists from other cities and states as well as from other countries who have mapped Nashik as their choice of travel destination. The natural beauty of Nashik, the status of the wine capital of India and its religious importance is getting a good footfall of around 25,000 to Nashik. Due to its marvelous winter season, the number gets doubled in this season.

मराठा आरक्षण लढ्यातील आंदोलक व कोरेगाव-भीमा दंगली प्रकरणी दाखल खोटे गुन्हे मागे घ्या- धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात झालेल्या शांतीपूर्ण मोर्चा आणि आंदोलनात सहभागी अनेक आंदोलकांवर तत्कालीन भाजप सरकारकडून दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

त्याचबरोबर २०१८ साली कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीत सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हेही तात्काळ मागे घ्यावेत अशीही मागणी श्री. मुंडे यांनी स्वतंत्र पत्राद्वारे केली आहे.

मराठा समाजाने एकत्र येत क्रांतिकारी व ऐतिहासिक आंदोलन करत राज्यभरात ५८ मोर्चे काढून तत्कालीन भाजप सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडले; या आंदोलनादरम्यान ४४ समाजबांधवांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. परंतु तत्कालीन सरकारने आंदोलकांची मुस्कटदाबी करत अनेकांवर गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे मागे घ्यावेत व त्या सर्व आंदोलकांना न्याय द्यावा, आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्यांच्या कुटुंबियांना आधार व मदत देण्याबाबत तातडीने अंमलबाजवणी करावी अशी अपेक्षा मुंडे यांनी लिहिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

०१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव – भीमा येथील वढू येथे उसळलेल्या दंगलीनंतर सुद्धा भाजपने ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या उक्तीप्रमाणे सरकारने सामान्य नागरिक, सामजिक कार्यकर्ते व असंख्य बुद्धिजीवी लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे असंख्य निष्पाप लोकांचे भवितव्य अधांतरी असून विनाकारण न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. या प्रकरणात अनेक बुद्धिजीवी व सामाजिक कार्यकर्त्यांना नक्सलवादी ठरवून भाजप सरकार मोकळे झाले.

गेल्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या महा विकास आघाडीच्या सरकारने धडाडीने निर्णय घेत ‘आरे’ जंगलातील वृक्षतोडीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमींवर व कोकणातील ‘नाणार’ प्रकल्पाच्या विरुद्ध आंदोलन केलेल्या सामान्य नागरिकांवर तत्कालीन भाजप सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेत सकारात्मक व आशावादी पाऊल उचलले आहे. त्याच धर्तीवर मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलक व कोरेगाव-भीमा दंगलीतील सर्व सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेऊन त्यांना दिलासा द्यावा तसेच मराठा आरक्षण आंदोलनात आहुती दिलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना दिलासा व मदत द्यावी अशी आग्रही मागणी श्री. मुंडे यांनी लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

जळगावच्या एकाची आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

यावल । प्रतिनिधी

तालुक्यातील कोळन्हावी तापी पुलावरून जळगावच्या एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी साडेसहा वाजता घडली. यावल पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

आत्महत्या करणारा व्यक्ती हा जळगाव येथील असल्याचे समजते. पोलिसांनी त्याचे प्रेत ताब्यात घेतले असून ते ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा; विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवावा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

नाशिक – दिल्ली विमानसेवा सुरु करा – खा. डॉ. भारती पवार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या वर्षभरापासून नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद पडली आहे. उत्तम प्रतिसाद मिळूनही विमानसेवा बंद पडल्यामुळे नाशिककरांची मोठी गैरसोय झाली आहे. नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देत असतात यादृष्टीने लवकरात लवकर विमानसेवा सुरु करावी अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदीय हिवाळी अधिवेशनात केली.

खा. डॉ. पवार म्हणाल्या की, माझ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये नाशिक जिल्ह्यात ओझर एअरपोर्ट हे अत्याधुनिक एअरपोर्ट आहे. त्या अनुषंगाने नाशिकमधून सध्याला अहमदाबाद आणि हैद्राबादला विमानसेवा केली जात आहे.

जेट एअरवेजची सेवा उत्तम प्रतिसादात सुरु होती. मात्र, जेट एअरवेज आर्थिक अडगळीत अडकल्यानंतर नाशिक दिल्ली विमानसेवा ठप्प झाली आहे. या गोष्टीला जवळपास वर्ष होत आले आहे.

नाशिकमध्ये सध्याच्या स्थितीत एअर कंनेक्टिविटी खूप गरजेची आहे. नाशिकमधील उद्योग असेल किंवा पर्यटन असेल यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही विमानसेवा अतिशय महत्त्वाची आहे.

नाशिक धार्मिक क्षेत्र आहे आणि त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे त्रंबकेश्वर येथे आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक भाविकांची संख्या मोठी आहे.

नाशिकच्या प्रवाशांसह धुळे, जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना देखील याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.  चांगला प्रतिसाद मिळतो आहे, शिवाय येथील कार्गो सेवाही उत्तम सुरु होती. विमान कंपन्यांना आर्थिक हातभार कार्गो सेवेतून मिळत असल्यामुळे हि सेवा लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

सहाव्या मजल्यावर केवळ मुख्यमंत्री बसणार?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आग लागल्यानंतर त्याचे नुतनीकरण करण्यात आले. इमारतीच्या नुतनीकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारील दालन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते. मात्र कालांतराने अजित पवार यांच्या व्यक्तव्याची वादग्रस्त व्हीडीओ क्लीप उघडकीस आल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर २०१४ साली राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. या सरकारला वर्ष दिडवर्षाचा कालावधी होताच महसूल मंत्रीपदी असलेल्या एकनाथ खडसे यांच्या विरोधातील भूखंड वाटप आणि कथित दाऊद इब्राहीम यांच्याशी कथित संभाषण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने त्यांनाही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची घटना संबध महाराष्ट्राने पाहिली.

एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपाचे अजातशत्रु असलेले पांडूरंग फुडकर यांना कृषीमंत्री म्हणून हे दालन देण्यात आले. परंतु मंत्रीपदाची धुरा वाहत काही महिन्यांचा कालावधी लोटत नाही. तोच त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे दालन नवे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना देण्यात आले. त्यांचा तर विधानसभेच्या निवडणूकीत पराभव होवून तूर्त तरी राजकारणातून बाहेर फेकले गेले.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येही ६ मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या शेजारील दालन नकोच अशीच भूमिका घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

विद्यमान परिस्थितीत मुख्य इमारतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ६ व्या मजल्यावर दालन राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी विस्तारीत इमारतीतील दालन स्विकारले आहे. राष्ट्रवादीचे आणखी नेते छगन भुजबळ यांना मुख्य इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

तर शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांना विस्तारीत इमारतीतील ३ रा मजल्यावर, मंत्री सुभाष देसाई यांना ५ व्या मजल्यावर, काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांना विस्तारीत इमारतीतील पहिल्य़ा मजल्यावर आणि काँग्रेस मंत्री डॉ.नितीन राऊत यांना मुख्य इमारतीतील ४ मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

Maha Govt to shelve Bullet Train project: Patil

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

MUMBAI:

The Maha Vikas Aghadi government will attempt to ascertain if mega projects, like the Mumbai-Ahmedabad Bullet Train, can be shelved in view of a staggering Rs 6.71 lakh-crore total debt burden on the state, Minister Jayant Patil said on Tuesday.

Talking to media here, he informed the debt burden includes Rs 4.71 lakh crore, besides obligation of another Rs 2 lakh-crore on ongoing projects.

“Now, we are reviewing what projects are critical for the development of the state and whether others like Bullet Train project can be postponed for a later stage,” Mr Patil added.

His comments came a couple of days after Chief Minister Uddhav Thackeray ordered a review of all undergoing development projects taken up by the previous government, especially the big-ticket ones like Bullet Train.

‘लक्ष द्या’ व ‘काळजीपूर्वक ऐका’; खा. गोडसेंच्या प्रश्नावरून दानवेंना लोकसभा अध्यक्षांनी फटकारले

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना सभागृहाच्या कामकाजाकडे लक्ष न दिल्याबद्दल चांगलेच फटकारले. केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री यांच्या वर्तनास सभापतींनी सपशेल नाराजी व्यक्त केली.  शिवसेनेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी प्रश्न विचारला असता  खा. दानवे यांनी खासदारांना हा प्रश्न पुन्हा विचारण्यास सांगितले. यानंतर सभापतींचा पारा अधिकच चढला त्यांनी आदरणीय मंत्री  ‘प्रश्नांकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका’ असे दानवे यांना सुनावले.

ते म्हणाले, “मी आणखी एक संधी देईन, पण तोच प्रश्न विचारू नका” असे सांगून खा. गोडसे यांना तोच प्रश्न विचारू नका असेही ओम  बिर्ला यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभेतील शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी गोडसे यांच्या जागेवर जाऊन सभापतींनी जे सांगितले त्याविषयी त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी खा. सावंत यांना सांगत बिर्ला म्हणाले की, खा. गोडसे यांना जे काही सांगायचे ते थोडक्यात सांगा.  खा. गोडसे यांनी आणखी एक प्रश्न विचारला असता, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान जे शेवटच्या ओळीत श्री दानवे यांच्यासमवेत बसले होते, त्यांनी उभे राहून उत्तर दिले.

त्यानंतरच्या पूरक प्रश्नांनाही श्री पासवान यांनी उत्तर दिले. हे पाहून सभापतींनी त्यांची इच्छा असल्यास बसून उत्तरे देण्यास सांगितले. बिर्ला म्हणाले, “तुमची इच्छा असेल तर तुम्ही बसून उत्तर द्या. सभा तुम्हाला परवानगी देते. तुमच्या पायाला फ्रॅक्चर आहे,” श्री बिर्ला म्हणाले. तथापि, खा. पासवान यांनी उभे राहूनच प्रश्नांची उत्तरे दिली.

यानंतर बिर्ला यांनी पुनरुच्चार करत “मी पुन्हा सांगत आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बसून उत्तर देऊ शकतात असे म्हणत सभागृहाची काळजी असल्याचेही बिर्ला यांनी दाखवून दिले.

यापूर्वी, प्रश्नोत्तराच्या वेळी पूरक प्रश्‍न विचारण्यास नावे दिल्यानंतर सभागृहात अनेक सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराज सभापतींनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनात ज्यांना प्रश्न विचारायची असतात अशा व्यक्तींची नावे दिली जातात. त्यानंतर त्यांची अनुपस्थिती दिसून येते अशा सदस्यांना अशा वेळी प्रश्न विचारण्याची संधी दिली जाणार नाही अशी तंबीही त्यांनी याप्रसंगी दिली.

प्रारंभी, गोडसे यांनी प्रश्न विचारला की, एफसीआय अंतर्गत वन परिसरात किंवा डोंगराळ परिसरात  दळणवळण अनुदान जे आहे ते २०१५ -१६ मध्ये ६० कोटी होते. ते २०१८-२०१९ मध्ये ४०० कोटी वर गेले. दुसऱ्या एका अनुदानात जे २०१५ -१६ मध्ये १ लाख होते ते अवघ्या तीन वर्षांत वाढून १०० कोटीवर गेले. हे का वाढले याबाबत प्रश्न खासदार गोडसे यांनी विचारला होता.

यावर काही उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारला असताना वरील प्रकार अधिवेशनात घडला. यावेळी पायाचे हाड मुडले असतानाही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उभे राहून उत्तर दिले. दरम्यान, पाहिजे तसे किंवा राज्याच्या भल्यासाठीचे उत्तर पासवान यांच्याकडून मिळाले नसल्याचेही गोडसे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.