Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 12319

राज्य मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून ‘द लास्ट व्हाईसरॉय’ प्रथम

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी
59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अकॅडमी या संस्थेच्या ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले. तर ओझरच्या एच.ए.ई. डब्लू.आर.सी रंगशाखा या संस्थेच्या ‘प्रार्थनासूक्त’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. नाट्यसेवा थिएटर्स, नाशिक या संस्थेच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले.

नाशिकच्या परशूराम सायखेडकर नाट्यगृहात 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधित या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकुण 18 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाम अधटराव , संदीप देशपांडे, व किर्ती मानेगांवकर यांनी काम पाहीले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेचा निकाल असा-
दिग्दर्शन – प्रथम-महेश डोकफोडे(द लास्ट हाईसरॉय), द्वितीय -हेमंत सराफ (प्रार्थनासुक्त) प्रकाशयोजना-प्रथम-कृतार्थ कंसारा(द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय-आकाश पाठक(प्रार्थनासूक्त), नेपथ्य-प्रथम मंगेश परमार(द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय गणेश सोनावणे(काठपदर), रंगभूषा-प्रथम-माणिक कानडे(द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय- सुरेश भोईर(ड्रीम युनिवर्स). उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक – अक्षय मुडवदकर, पूनम पाटील( द लास्ट व्हाईसरॉय)

यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे-
पूनम देशमुख (नाटक-साधे आहे इतकेच), प्राजक्ता भांबारे(भोवरा), मनिषा शिरसाठ(काठपदर), भावना कुलकर्णी(प्रेमा तुझा रंग कसा), पल्लवी ओढेकर(कहाणी मे ट्विस्ट), समाधान मुर्तडक(अरे देवा), संदेश सावंत (प्रार्थनासुक्त), विक्रम गवांदे(वारुळ), आदित्य भोंम्बे(साधे आहे इतकेच) कुंतक गायधनी(अंधायुग)

हे नाटक लिहण्यासाठी मला साडे तीन वर्ष लागली. नाटकासाठी एकुण 13 पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे. आम्ही सर्व कलाकार गेल्या सहा महिन्यापासून नाटकाची तालीम करत होतो. त्यामुळे नाटकाला मिळालेले ंहे यश संपूर्ण टीम चे आहे. रंगभूमीची जर प्रामाणिक सेवा केली तर यश हमखास मिळते याचा प्रत्यय आलां आहे. कारण हे माझे तिसरे नाटक असून माझी तीनही नाटके नंबरात आली आहे.
-महेश ककडोकफोडे- लेखक/ दिग्दर्शक ‘द लास्ट व्हाईसरॉय

भिंगार छावणी मंडळ निवडणूक सेनेविरोधात राष्ट्रवादीचा शड्डू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महाविकास आघाडीच्या प्रयोगाला सुरूंगाची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – नव्या वर्षात भिंगार छावणी मंडळ सदस्य निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आजपर्यंत शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असा सामना झालेल्या भिंगारच्या या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा कित्ता गिरणार की पुन्हा सेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान राष्ट्रवादीने आतापासूनच शिवसेनेविरोधात लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

भिंगार छावणी मंडळाच्या विद्यमान सदस्यांची मुदत 10 फेबु्रवारी 2020 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सात सदस्य निवडीसाठी जानेवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन तर एक भाजप असे बलाबल आजमितीला आहे. भाजप सदस्याच्या पाठबळावर छावणी मंडळाचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीने पटकाविले होते. राष्ट्रवादीचे मुस्सा सय्यद हे छावणी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

भिंगार हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलेली मते पाहता शिवसेनेला निवडणूक अवघड जाईल असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय अनिल राठोड हे दुसर्‍यांदा विधानसभा निवडणूक पराभूत झाल्याने त्यांनाही फारसा इंटरेस नसेल असा दावा करत राष्ट्रवादी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. राज्यातील भाजप सत्तेला सुरूंग लावत भाजपचा सफाया करण्याचे या महाविकास आघाडीचे मनसुबे असल्याचे बोलले जाते.

भिंगारमध्ये मात्र भाजपचा अवघा एक सदस्य असल्याने अन् भाजपचे प्राबल्य नसल्याने येथे भाजप नगण्य आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीत आघाडी विरुध्द शिवसेना अशीच लढत झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार? याची उत्सुकता नगरकरांना आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी भिंगारमध्ये तो प्रयोेग होणार नाही असा दावा करत राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गुरूवारी आरक्षणावर चर्चा
सात सदस्य संख्या असलेल्या छावणी मंडळात दोन महिलांसाठी तर एक वार्ड अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. एससीसाठी राखीव असलेला वार्ड नंबर सातमधील लोकसंख्या पाहता यंदाही या वार्डातील आरक्षण कायम राहिल असे सूत्रांकडनू सांगण्यात आले. तर 1 आणि 5 नंबर वार्डातील महिला आरक्षण इतर वार्डात पडून हे वार्ड खुले होतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 5 डिसेंबरला छावणी मंडळ सदस्यांची बैठक होत असून त्यात आरक्षणाचा विषय काढला जाणार आहे.

उपाध्यक्षांवर टांगती तलवार
छावणी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष मुस्सा सय्यद हे तीन नंबर वार्डाचे प्रतिनिधीत्व करतात. 2,3,4,6 या खुल्या वार्डात महिला आरक्षण टाकले जाणार आहे. त्यामुळे उपाध्यक्ष सय्यद यांचा 3 नंबर वार्ड महिलासाठी आरक्षित झाला तर त्यांची पंचायत होणार आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे रवींद्र लालबोंद्रे, प्रकाश फुलारी आणि राष्ट्रवादीचे कलीम शेख यांच्यावरही आरक्षणाची टागंती तलवार आहे.

विद्यमान सदस्य
शिवसेना 3 – संजय छजलानी, प्रकाश फुलारी, रवींद्र लालबोंद्रे
राष्ट्रवादी 3 – मीना मेहतानी, मुस्सा सय्यद, कलीम शेख
भाजप 1 – शुभांगी साठे

वार्डनिहाय मतदार

वार्ड 1- 953
वार्ड 2- 3036
वार्ड 3- 1905
वार्ड 4- 2535

वार्ड 5- 2093
वार्ड 6- 1707
वार्ड 7- 2182

राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना खुशखबर देणार; कर्जमाफीची तयारी पूर्ण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवले होते. दरम्यान, अहवाल प्राप्त झाले असून बारीक बारीक गोष्टींचा यात विचार करण्याबाबत आढावा आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पार पडला.

आगामी काळात शेतकऱ्यांना सरसकट आणि संपूर्ण कर्जमुक्ती होण्यासाठी ठाकरे सरकार पावले उचलण्याची दाट शक्यता आहे. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

कर्जमाफीसाठी राज्याला 35 हजार 800 कोटी रुपयांची गरज असून, हा निधी राज्य सरकार केंद्राच्या मदतीशिवाय उभा करू शकता येईल असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यासोबतच अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील 1 कोटी 3 हजार शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात आला.  या बैठकीस छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्याबाबत आर्थिक परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला. आर्थिक स्थिती बेताचीच असली, तरी कर्जमाफी करू शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत कृषी, सहकार, महसूल आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात सादरीकरण केले. दरम्यान, युती सरकारने आतापर्यंत 42 लाख शेतकऱ्यांना 18,891 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. अद्यापही 6000 कोटींची कर्जमाफी शिल्लक असल्याची माहितीही देण्यात आली.

लोणीतील गोळीबार प्रकरणातील चार आरोपी जेरबंद

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लोणी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील लोणी येथे रविवारी श्रीरामपुरच्या फरदिन अबू कुरेशी या युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. श्रीरामपुरचे तीन तर लोणीतील चार आरोपी या घटनेनंतर पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्यातील चार जणांना रात्री जेरबंद केले. त्यामध्ये संतोष कांबळे, सिराज शेख व शाहरुख शहा हे श्रीरामपूर येथील तर अरुण चौधरी या लोणी येथील आरोपींचा समावेश आहे, आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे.

जळगाव : ढाब्यासमोर झोपलेल्या ट्रक चालकाचा झोपतच मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव– औद्योगिक वसाहतमध्ये ट्रक चालकाचा झोपेतच मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास क्लिनरच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामदास देविदास बैरागी (वय ५५, रा.अजयनगर, वरणगाव, ता. भुसावळ हे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (जळगाव) येथे गॅस हंड्या वाहतूक करणार्‍या ट्रकवर चालक म्हणून कामाला आहेत. त्यांनी सोमवारी रात्री ट्रक पार्किंगला लावला. जेवणानंतर ते एमआयडीसी परिसरातील पी सेक्टरमधील महामार्गावरील पेट्रोल पंपासमोरील नाना यांच्या ढाबासमोर झोपले. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ट्रकवरील सहाय्यक रमेश सोनार हा त्यांना उठवण्यासाठी गेला. परंतु, रामदास बैरागी हे मयत स्थितीत आढळून आले.

ट्रकवरील क्लिनरने नशिराबाद येथे राहणारे ट्रक मालक नरेंद्रसिंग शीतलसिंग यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार नरेंद्र सिंग शीतल सिंग यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रतिलाल पवार हे करीत आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
ट्रकचालक रामदास बैरागी यांना या अगोदर चार-पाच महिन्यांपूर्वी हदयविकाराचा झटका आला होता. असाच काही अचानक त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांच्या नातेवाईकांनी वर्तवला. त्यांचा मुलगाही ट्रकचालक असून तो सध्या कोलकाता येथे आहे. त्याला या घटनेबाबत कळवण्यात आले आहे. तो बुधवारी घरी येईल. त्यानंतर मृत ट्कचालकावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगा आहे.

आयपीएल लिलावात एकूण ९७१ खेळाडू वर्तुळात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : आयपीएल २०१९ १३ व्या हंगामाचा लिलाव येत्या १९ डिसेंबरला कोलकात्यात होणार आहे. या लिलावात एकूण ९७१ खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये ७१३ खेळाडू भारतीय तर २५८ विदेशी खेळाडू आहेत ऑस्ट्रेलियाचे ५५ खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत. आठही संघ मिळून ७३ जागा शिल्लक आहेत ऑस्ट्रेलिया संघाचा डावखुरा लेफ्ट आर्म तेज गोलंदाज मिचेल स्टार्क याने लिलावातून माघार घेतली आहे.

२९ वर्षीय मिचेल स्टार्कने २०१५ साली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून आपली शेवटची म्याच खेळली होती. २०१८ साली झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात कोलकात्याने स्टार्कला ९. ४ कोटी मध्ये खरेदी केले होते. पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. २०१९ मध्ये तो दुखापतीतून सावरत होता. पण विश्वचषकाच्या साठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती.

आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचे स्टार्कचे हे पाचवे वर्ष आहे. २०१६ मध्ये दुखापतीमुळे तो बाहेर होता. २०१७ हंगामात त्याने आपले नाव मागे घेतले होते. २०१८ मध्ये कोलकात्याकडून तो एकही सामना खेळू शकला नव्हाता. बंगळूरकडून त्याने २७ सामन्यांमध्ये २०. ३८ च्या सरासरीने एकूण ३४ विकेट्स काढल्या होत्या. २०१४-२०१५ हंगामात तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. १५ धावा ४ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

टीम            एकूण रक्कम
कोलकाता    ३५. ६५ कोटी
चेन्नई         १४. ६० कोटी
दिल्ली         २७. ८५ कोटी
पंजाब         ४२. ७० कोटी
मुंबई          १३. ०५ कोटी
राजस्थान   २८. ९० कोटी
बंगळूर       २७. ९० कोटी
हैद्राबाद      १७ . ०० कोटी

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

५० वर्षीय व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; कळवा नाका परिसरातील घटना

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी 

आज सकाळी कळवा नाका परिसरात एका इसमाने बांधकाम सुरू असलेल्या मोटार ब्रिजवरून फाशी लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस यंत्रणा वेळीच दाखल झाल्याने या व्यक्तीला वाचविण्यात यश आले आहे.

आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. एक जन मोटार ब्रिजवरून एका दोरखंडनिशी फाशी घेत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर स्थानिकांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला.

घटनास्थळी वपोनि शेखर बागडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच या परिसरातून जाणाऱ्या एका क्रेनच्या सहाय्याने या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

दरम्यान, या व्यक्तीची चौकशी केली असता त्यांचे धनाजी भगवान कांबळे (वय ५०) असे असल्याचे समजले. त्यांच्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.

त्र्यंबकेश्वर : कुशावर्तातील पाण्याच्या शुद्धीकरणाचा प्रश्न मिटणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थतील पाणी शुद्धीकरणासाठीबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथमच या बैठकीत मुंबई येथील मत्सालय उभारणीबाबत बोलतांना त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचाही उल्लेख केला. या ठिकाणी असणाऱ्या कुशावर्तात लाखो भाविक स्नान करतात. त्यामुळे येथे योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे महत्वाचे ठिकाण मानले जाते. या ठिकाणी कुशावर्त तीर्थ असून कुंभमेळा व इतर दिवशी लाखो भाविक स्नान करीत असतात. परंतु कालांतराने येथील पाणी अस्वच्छ होत असते. त्यासाठी देखील फिल्टरेशनकरिता मागील कुंभमेळ्यात फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता खालावल्याने सध्या योग्य ती स्वच्छता होत नाही. दरम्यान काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान कुशावर्ताच्या जलशुद्धीकरणासाठी येथील नगरपालिका दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल नगर पालिका अदा करीत असते. इतके पैसे खर्च करुनही पाणी शुद्ध होत नसेल तर या फिल्टरेशन प्लँटची क्षमता तपासण्याची आवश्यकता आहे. कुशावर्ताच्या शुद्धीकरणासाठी सन २०१५च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अडीच कोटी रुपये खर्च करून हा फिल्टरेशन प्लँट उभारण्यात आला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तीन वर्षे हा प्लँट चालवला आणि नंतर पालिकेस हस्तांतरीत केला. तथापि तीन वर्षांपासून सुरू असलेले जलशुद्धीकरण चौथ्या वर्षांनंतर त्याची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामास गती दिल्यास पाण्याची शुद्धता कायम ठेवण्यास यश येईल.

…म्हणून या गावात श्वानांना देतात वाघासारखा रंग; शेतकऱ्याच्या अनोख्या शक्कलीची सर्वत्र चर्चा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

भारतातील शेतकऱ्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे संकटाला सामोरे जावे लागते. अनेक भागांत जंगली जनावरांपासून या शेतकऱ्यांना मोठा धोका असलेला बघायला मिळतो.

शेतकऱ्यांना त्यांच्या जिवाचाच नाही तर जंगली जनावरांपासून पिकालाही वाचवावे लागते. कर्नाटकमधील एका गावात  कॉफी आणि  सुपारीच्या पिकांना माकडांपासून वाचविण्यासाठी एक झोप उडविणारी शक्कल येथील शेतकऱ्यांनी काढली आहे.

शिवमोगा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव कुत्र्यांना वाघासारखा रंग दिला आहे. यामुळे माकडे शेतातील पिकांची नासाडी न करत घाबरून पळून जातात असे येथील शेतकरी श्रीकांत गौड़ा यांनी सांगितले.

ते म्हणाले, याआधी वाघाच्या खेळण्यांचादेखील उपाय करून बघितला आहे. याचा परिणाम बघायला मिळाला नसला तरी काही अंशी येथील शेती वाचविण्यात या शेतकऱ्यांना यश आले.

गोव्यातील या खेळण्या मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान, या खेळण्यांचे रंग निघून गेल्याने माकडांना त्याची भीती वाटत नव्हती त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान काही थांबत नव्हते.

यानंतर श्रीकांत यांनी शेतातील पाळीव कुत्र्यांना वाघासारखे बनवले. त्यांना तसाच रंग दिला. लहान आकारातले वाघच दिसलेल्या कुत्र्यांना बघून माकडे शेतातून पळून जातात.

त्यांना दररोज दोन वेळा शेतात घेऊन जाऊन माकडांना सध्या पळविण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या गावातील बहुतेक शेतकरी आता हा पर्याय वापरत असून संपूर्ण गावातील कुत्रे लहान वाघाप्रमाणे शेतात वावरताना नजरेस पडतात.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख  8  हजार 400 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.