Sunday, May 4, 2025
Home Blog Page 12325

नुकसानग्रस्तांना मदतीचा दुसरा हप्ता उद्या मिळणार ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले संकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंंबर महिन्यांत अतिवृष्टी आणि अवेळी पावसाने शेतकर्‍यांचे 485 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने मदतीचा अहवाल तयार करून शासनाकडे भरपाईसाठी पाठविला होता. त्यानुसार सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता. यातील दुसर्‍या टप्प्यातील निधी उद्या (सोमवारी) मिळणार असल्याचे संकेत विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना दिले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी विभागीय आयुक्त माने यांच्याकडे केली असून पहिल्या हप्त्यातील जवळपास 80 टक्के रक्कम तालुका पातळीवर आणि तेथून शेतकर्‍यांपर्यंत वर्ग करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

जिल्ह्यात अवेळी आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून 4 लाख 54 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकर्‍यांची संख्या 6 लाख 36 हजार 146 आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनदरबारी होता. त्यानूसार नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी बँकेत वर्ग करण्यात आला. या मदतीचे वाटप तालुकास्तरावरून करण्यात येत आहे.

खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे. मात्र बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्ध्वस्त केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शासनाला पाठविलेल्या शासनाला पाठविलेल्या 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बँकेत वर्ग झाले.

दरम्यान, नुकसानीच्या दुसर्‍या हप्त्यासंदर्भात विभागीय आयुक्त माने यांनी संकेत दिले आहेत. सोमवारी मदतीचा दुसरा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही मदत आल्यानंतर तातडीने ती बाधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बँकेत वर्ग झाले.
दरम्यान, नुकसानीच्या दुसर्‍या हप्त्यासंदर्भात विभागीय आयुक्त माने यांनी संकेत दिले आहेत. सोमवारी मदतीचा दुसरा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही मदत आल्यानंतर तातडीने ती बाधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.

विकास आराखडा ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पुणतांबा ग्रामपंचायत सरपंचासह बहुतांशी सदस्यही गैरहजर

पुणतांबा (वार्ताहर) – गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाठ फिरविली. तसेच सरपंच व बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्यामुळे पुणतांब्याच्या विकासाबाबत गावच्या विकासाच्या गप्पा मारणारे नेते व ग्रामस्थ किती जागृत आहे, याचा प्रत्यय दिसून आला.

शनिवारी 11 वाजता गावच्या विकासाचा आराखड्यावर चर्चा करण्यासाठी उपसरपंच वंदना धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य श्याम माळी, सर्जेराव राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी डी. के. राऊत, डॉ. घालम, नामदेव धनवटे, प्रताप वहाडणे, जे. डी. धुमाळ, अरुण बाबरे, डॉ. बखळे, संदीप वहाडणे आदींसह शिक्षण व आरोग्य विभागाच्या काही सेवकांसह 20 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या गावच्या ग्रामसभेत 30 ते 40 ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी उशिरा सुरू झालेल्या ग्रामसभेचे प्रास्ताविक केले. यावेळी नामदेव धनवटे यांनी नियमानुसार ग्रामसभेची सूचना 7 दिवस अगोदर दिली पाहिजे, आपण काल 29 तारखेचा उल्लेख करून फलकावर सूचना लावली हे कायदेशीर नाही. या बाबीकडे लक्ष वेधले. मात्र या मुद्यामुळे ग्रामविकास अधिकारी निरूत्तर झाले व त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी गावच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, शेतकरी, महिला व बालकल्याण युवक प्रशिक्षण, अनु. जाती, जमाती पर्यावरण तीर्थस्थळ, धार्मिक ठिकाण विकास, पशुसंर्वधन, वृक्षारोपण, अपंग व्यक्तीसाठी योजना माहिती व तंत्रज्ञान, ग्रंथालय, सौर उर्जा, गाव सुशोभीकरण या घटकावर चर्चा करून विकास आराखड्यात कोणत्या बाबींचा समावेश करावयाचा आहे, याबाबत सूचना करण्याचे आवाहन केले. विकास आराखडा तयार केल्यामुळे 15 व्या वित्त आयोगात पुरेसा निधी मिळेल. तसेच प्रत्येक वर्षासाठी आराखड्यानुसार विकासाच्या योजना प्रभावीरित्या राबविता येईत, असे स्पष्ट केले.

पुणतांबा- चांगदेवनगर रस्त्याच्या विद्युतीकरणाचा आराखड्यात समावेश करण्याची सूचना डॉ. बखळे यांनी केली. शिक्षण विभागाशी निगडीत मागण्यांची यादीच सोमनाथ वैद्य यांनी सादर केली. वीज विभागाच्या प्रतिनिधीने ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईनवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते, ही बाब निर्दशनास आणून दिली. कृषी विभागाचे धुमाळ यांनी कृषी योजनांची माहिती दिली. यावेळी अरुण बाबरे, प्रताप वहाडणे, सर्जेराव जाधव, महेश कुलकर्णी, डॉ. बखळे यांनी चर्चेत भाग घेतला. ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याबद्दल नाराजीचे वातावरण होते.

वीज मंडळाच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी हैराण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला. आता पाऊस उघडला. वीज मंडळाने शेतकर्‍यांना जेरीस आणले आहे. कार्यकारी अभियंता म. राज्य वीज मंडळ, कर्जत जि.अहमदनगर यांचेकडून शेतकर्‍यांना जळालेले ट्रान्सफार्मर महिना , दोन महिने मिळत नाहीत. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे ठेकेदार भरपूर आहेत. परंतु वीज मंडळाकडे ऑईल नसल्याचे कारण वेळोवेळी सांगितले जाते. कधी कधी तुमचा नंबर फार लांब आहे असे सांगितले जाते. वीज मंडळात लाईन ओढण्याची ठेकेदारी करणारे काही ठेकेदार शेतकर्‍यांकडून 15 ते 20 हजार रुपये घेऊन ऑईलसह ट्रान्सफार्मर तातडीने पोहोच करतात. ही शेतकर्‍यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक आहे अशी तक्रार श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल पाठवून केली आहे. तसेच आपले सरकार या पोर्टलवरही दाखल केली आहे.

प्रा. दरेकर म्हणाले, हिरडगाव येथील दरेकर मळ्यातील ट्रान्सफार्मर 15 दिवसात दोन वेळा जळाला. त्याच्या कारणांची शहानिशा करून वीज मंडळाने ट्रान्सफार्मर भरणार्‍या ठेकेदाराकडून हमी ( वारंटी) कालावधीत तातडीने ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी वीज मंडळाने तत्परता दाखविली पाहिजे. परंतु वीज मंडळाचे अधिकारी शेतकर्‍यांनाच पिळू पिळू घेतात. एका बाजूला शेतकर्‍यांना न्याय देणार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात आणि वीज मंडळाचे अधिकारी नेमके उलटे वागतात. शासनाने जळालेला ट्रान्सफार्मर दोन ते तीन दिवसात देण्याची व्यवस्था करावी व त्यासाठी लागणारे ऑईल मान. कार्यकारी अभियंता , म.रा. वीज मंडळ यांना उपलब्ध करून द्यावेत. ऑईलसाठी शेतकर्‍यांचा खोळंबा करू नये.

वीज मंडळाचे अधिकारी शेतकर्‍यांना जुमानत नाहीत. त्यांची चेष्टा करतात. फोन उचलत नाहीत. ट्रान्सफार्मर घेऊन जाण्यासाठी शेतकर्‍यांना भाड्याच्या गाड्या करावयास लावतात. दरमहा किती ट्रान्सफार्मर जळाले ? त्यापैकी किती भरून दिले ? किती दिवसांनी भरून दिले ? याचा आढावा दर महिन्याला वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतला पाहिजे.

सध्या शेतकरी सर्व खात्यामध्ये वीज खात्याला फारच वैतागलेले आहेत. या खात्याच्या सचिवांनी स्वत: लक्ष घालून याबाबत शिस्त निर्माण करावी अशी अपेक्षा आहे. सध्या कर्जत ( अहमदनगर ) येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे सुमारे 80 जॉब (ट्रान्सफार्मर) शेतकर्‍यांना देणे पेंडिंग आहेत, अशी माहिती मिळते.हे किती दिवसांनी मिळणार ? तोपर्यंत शेतकर्‍यांची पिके जगणार का ? हा खरा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्ती नंतर वीज मंडळ अनैसर्गिक आपत्ती निर्माण करीत आहे, असेही प्रा. दरेकर म्हणाले.

महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना समारंभपूर्वक निरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार अखेर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. शासनाने तसे पत्र शनिवारी महापालिकेला दिले. दरम्यान, महापालिकेतर्फे भालसिंग यांना शनिवारी सायंकाळी निरोप देण्यात आला.

महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग शनिवारी दि. 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यभार कोणाकडे सोपविण्यात येणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. राहुल द्विवेदी यांच्याकडे आतापर्यंत तीनवेळा महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार आलेले आहे. भालसिंग निवृत्त झाल्यानंतर लगेच पुर्णवेळ आयुक्त मिळेल, असेही सांगितले जात होते. मात्र राज्यात सत्ता स्थापनेचा खेळ सुरू झाल्याने बदल्या करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला.

मध्यंतरी एका शिष्टमंडळाने नगरविकास खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन पुर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना पुर्णवेळ आयुक्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

असे असले तरी नगरला येण्यासाठी अधिकारी उत्सूक नाहीत. अनेकांच्या नावांची चर्चा असतानाही त्यापैकी कोणाचीच बदली येथे अद्याप झालेली नाही. शनिवारी सायंकाळी नगरविकास खात्याकडून महापालिकेला आलेल्या पत्रात आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे सोमवारपासून महापालिकेत पुन्हा एकदा ‘द्विवेदी राज’ सुरू होणार आहे. दरम्यान, आयुक्त भालसिंग यांना आज महापालिकेतर्फे सायंकाळी उशीरा निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, इतर पदाधिकारी, नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

नेवासा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

स्थानिक गुन्हे शाखा करते काय ? नागरिकांचा सवाल

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असताना छोट्या मोठ्या धाडी टाकून मोठ्या-मोठ्या कारवाया केल्याचा आव आणणारी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आहे कुठे आहे? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून नेवासा तालुक्यातील सर्वच गावांसह भेंडा-कुकाणा परिसरात मंदिरातील दानपेट्या फोडणे, शेतकर्‍यांच्या केबल, स्टार्टर आणि विहिरीतील पाणबुडी पंप चोरी, दुचाकी मोटारसायकल,चारचाकी वाहने चोरी, मोबाईल शॉपी, सराफ दुकाने, किराणा दुकाने फोडण्याचा चोरांनी उच्छाद मांडला आहे. दोन महिन्यात 100 हून अधिक शेतकर्‍याच्या मोटारी, केबल चोरी गेले आहेत. कुकाणा येथील अभिजित लुनिया यांच्या चारचाकी गाड्यांची चोरीचाही अद्याप तपास नाही.

चार वर्षांपूर्वी आणि दुसर्‍यांदा याच नोव्हेंबर महिन्यात पुन्हा नागेबाबा मंदिर दानपेटीच्या चोरीचाही अद्याप तपास नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे जनता संशयाने पहात आहे. भेंडा परिसरात दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला असताना छोट्या-मोठ्या धाडी टाकून मोठ्या-मोठ्या कारवाया केल्याचा आव आणणारी एलसीबी आहे कुठे? असा सवाल भेंडा शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

असा आहे एलसीबीचा उद्योग…!
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) नावाचे एक विशेष पथक आहे. यासाठी एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक व स्वतंत्र पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचार्‍यांवर बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, कोर्ट समन्स यासारखी एक ना अनेक कामे असतात त्यामुळे गुन्ह्याचे तपासाकडे दुर्लक्ष होते. मात्र एलसीबी ही एक स्वतंत्र यंत्रणा असल्याने जिल्हातील गुन्ह्यांचा तपास एलसीबीने लावणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात जनतेला एलसीबीचा वेगळाच अनुभव असल्याचे दिसून येते. गुन्ह्याच्या तपास आणि चौकशीच्या नावाखाली कोणालाही उचलून गाडीत घालायचे आणि धमकावयाचे आणि खरे गुन्हेगारांकडे दुर्लक्ष करायचे असे काम सध्या एलसीबीचे सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलले जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था नामकरण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (वार्ताहर) – महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था या संस्थेचे नावात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. यापुढेही ही संस्था जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाणार आहे. या स्वरूपाचा शासन निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे.

यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने ऑगस्ट 2017 मध्ये जिल्ह्यासाठी शिक्षण प्रशिक्षण देणार्‍या जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था असे नाव बदलून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था असे केले होते. तथापि या संस्था स्थापन करताना केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये राज्याने जे नाव बदलून नवे नाव धारण केले आहे. त्या नावाचा समावेश होत नसल्यामुळे व आर्थिक व्यवहार करण्यातही अडचणी येत असल्यामुळे या संस्थेच्या नावात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढेही संस्था जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखले जाणार आहे.

संस्थाच्या नावात पुन्हा बदल
राज्य सरकारने यापूर्वी शिक्षकांना प्रशिक्षण देणार्‍या, अभ्यासक्रमाचे धोरण ठरविणार्‍या, अभ्यासक्रम निर्धारित करणार्‍या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या नावात बदल करून महाराष्ट्र विद्या प्राधिकरण असे नाव धारण केले होते. या संस्थेच्या नावातही दोन वर्षाच्या आत बदल करण्यात आला असून पुन्हा एकदा त्या संस्थेला मूळ नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता पुणे येथील या मुख्य संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदत असेच निश्चित करण्यात आले आहे .त्यापाठोपाठ राज्यात असलेल्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था या संस्थेचे नाव बदलून जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था असे करण्यात आले आहे.

लाचेची मागणी करणार्‍या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करू नये व मदत करण्याच्या मोबदल्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद या दोघाना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी पुणतांबा फाटा पंचासमक्ष केल्याने नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव, शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील रहिवाशी सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता, कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी विक्रीचे दुकान असून कोपरगाव बागुल वस्ती येथील बंडू जगताप नावाच्या एका युवकाने त्यांच्याकडून मे 2018 रोजी एक बजाज पल्सर कंपनीची दुचाकी खरेदी केली होती.त्याने ती संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बाजारात अज्ञात इसमास अदलाबदल करून विकली. शिर्डीत एका परप्रांतीय महिलेची पर्स ओढताना काही चोरटे पकडण्यात आले होते.

त्यात ही प्लसर गाडी सापडल्याने शिर्डी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांनी दुचाकी दलाल सागर सय्यद व त्यांचा भाऊ मोहसीन सय्यद यांचेकडील असल्याचा बहाणा करून सागर सय्यद त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा राहुल काकडे यांची नावे वगळण्यासाठी पन्नास हजारांची मागणी केली. त्यात तडजोड होऊन ती रक्कम चाळीस हजार रुपये करण्यात आली. ही रक्कम जास्त व अन्यायकारक वाटल्याने या दोघांनी याबाबत अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्याय मागितला होता.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीवर शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान सापळा लावला होता. त्यात फिर्यादी सागर सय्यद व त्याचा भाऊ मोहसीन सय्यद व त्यांच्याकडे काम करणारा मुलगा राहुल काकडे यांना अटक न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपये देण्याची चर्चा तेथे असलेल्या पंचासमक्ष चालू असताना आरोपी पोलीस शिपाई सुपेकर व मैद यांना संशय आल्याने त्यांनी पोबारा केला होता.

दरम्यान या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी एच. डी. खेडकर यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे आरोपी ज्ञानेश्वर सुपेकर व विशाल मैद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक करांडे हे करीत आहेत.

नगरमध्ये एलईडीचा प्रस्ताव तातडीने सादर करा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महापौर वाकळे : विद्यूत विभागाच्या कारभाराबाबत नाराजी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचा पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्यूत विभागाला दिले.

शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणार्‍या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी (दि.29) सायंकाळी विद्यूत विभागाची बैठक घेतली. बैठकीस नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनिल त्र्यंबके, रविंद्र बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, संजय ढोणे, सुरज शेळके, सतीश शिंदे, विद्यूत विभाग प्रमुख कल्याण बल्लाळ आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत विद्यूत विभागाच्या कामकाजाबाबत महापौर वाकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यूत विभागाचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत. नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, यापुढील काळात हे खपून घेतले जाणार नाही. कामचुकार कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शहरातील पथदिव्यांच्या वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. हे दिवे लावल्यानंतर किती वीजबचत होईल, तसेच एलईडी दिव्यांसाठी महापालिकेला किती खर्च येईल, कोणत्या रस्त्यावर किती वॅटचे दिवे लावावे लागतील, कॉलनीत किती वॅटचे दिवे लागतील याचा अभ्यास करुन तसेच अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या इतर महापालिकांमधून माहिती घेऊन प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मला विद्यूत विभाग नको : बल्लाळ
महापालिकेच्या विद्यूत विभागाचे प्रमुख अभियंता कल्याण बल्लाळ यांनी बैठकीत आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, आपण सिव्हील इंजिनइर असून विद्यूत विभागाचा आपणास अनुभव नाही. त्यामुळे माहिती नसलेल्या कोणत्याही प्रस्तावावर आपण सही करणार नाही. मला जेलमध्ये जायचे नाही. विद्युत विभागाच्या प्रमुखपदी त्या विभागाची माहिती असलेला विद्यूत अभियंता नेमावा.

आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नातेवाईकांचा हॉस्पिटलसमोर ठिय्या, डॉक्टरविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – येथील आत्मा मालिक रुग्णालय संचालित, एव्हर हेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या डॉक्टरांकडून हृदयाचे छिद्र बंद करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर बालकाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयास घेराव घालून एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. च्या संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉक्टरांनी ऑपरेशन विषयी आपल्याला काहीच माहिती दिली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. तर शस्त्रक्रियेपूर्वी आपण सर्व माहिती दिल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

याबाबतची माहिती अशी, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बिपखेडा येथील नानासाहेब जाधव यांचा मुलगा रोशन जाधव (वय 4) याच्या हृदयाला छिद्र असल्याने त्याला आत्मा मालिक रुग्णालयद्वारा संचालित, एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. येथे घेऊन आले होते. येथील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठला रोशन याला शस्त्रक्रिया कक्षामध्ये नेण्यात आले. त्यानंतर तेथे साधारण सात ते आठ तास म्हणजे शनिवारी पहाटेपर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. ऑपरेशन झाल्यानंतर रोशन याचा काही वेळाने मृत्यू झाला. ही बाब डॉक्टरांनी नातेवाईकांना कळविल्याचे रोशन याचे नातेवाईक कचरू महाले यांनी दिली.

याबाबत माहिती देताना कचरू महाले म्हणाले, कृपया लहान मुलाच्या हृदयाला होल असल्यास त्वरित कळवा. विना ऑपरेशन (डिवाइसद्वारे) मोफत इलाज आत्मा मालिक हॉस्पिटल संचालितद्वारा, एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. ही सोशल मीडियावरील जाहिरात वाचूनच रोशन याला आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. शुक्रवारी रोशन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान प्रकृती अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात घेराव घालून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत आत्मा मालिक द्वारा संचालित, एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. चे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप केला.

नातेवाइकांचा गोंधळ सुरू असताना, घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पोलीस दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तुमची काही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला नोंदवा, आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत असे सांगून परिस्थिती नियंत्रणात आणली. मयत रोशनचे वडील नानासाहेब जाधव म्हणाले, फॉर्मवर सह्या करा अगदी मोफत शस्त्रक्रिया करू, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही सहमती दर्शवली.

संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी रोशन याच्या नातेवाईकांना आपण सर्व कल्पना दिली होती असे सांगितले. मात्र आपल्या मुलाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप वडील नानासाहेब यांनी केला. हॉस्पिटलचे फुटेज तपासून, दोषींवर कारवाईची मागणी यावेळी कुटुंबीयांनी केली. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांगितले, रोशन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे पाठवून दिला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घाटी रुग्णालयाकडून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांबाबत नातेवाईकांचा काही आक्षेप असल्यास त्याचीही तक्रार नोंदवून घेण्यात येईल.

सरकारी योजनांचा लाभ उठविणे या दृष्टिकोनातून नामांकित व गुडविल प्राप्त हॉस्पिटल करार बेसिसवर चालविण्यास घेऊन त्याद्वारे आपले उखळ पांढरे करण्याचा एक मोठा व्यवसाय सध्या सर्वत्र सुरू आहे. आत्मा मालिक संचालितद्वारा, एव्हरहेल्दी हॉस्पिटल प्रा. लि. ही संस्था कार्यरत आहे.

नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग 13 ची लवकरच पोटनिवडणूक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मंगळवारी मतदार यादी होणार प्रसिद्ध

नेवासा (तालुका वार्ताहर) – नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग 13 मध्ये लवकरच पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषीत केला आहे. 3 डिसेंबरला मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

नेवासा शहरातील प्रभाग क्र. 13 मधील क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नगरसेविका फेरीजबी इमामखान पठाण यांचे नगरसेविका पद अतिक्रमणाच्या कारणावरून रद्द करण्याचा निर्णय झाल्याने त्यांच्या जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी या प्रभागाचा निवडणूक याद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे.

त्यानुसार या प्रभागातील प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी 3 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. 4 ऑक्टोबर 2019 या रोजी बनवलेली व विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणलेल्या मतदार यादीत समाविष्ट मतदार निवडणुकीसाठी पात्र असतील. प्रसिद्ध मतदार यादीवर 7 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येतील. 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रभागातील मतदान केंद्रांच्या नावासह यादी 12 डिसेंबरला प्रसिद्ध होईल. या पोटनिवडणुकीत विजयी होणार्‍या नगरसेवकाला जवळपास अडीच वर्षांचा कार्यकाल (मे 2022 अखेरपर्यंत) मिळणार आहे.