Sunday, September 6, 2026
HomeराजकीयRahul Gandhi : राहुल गांधींचा अमित शाहांवर हल्लाबोल; म्हणाले, "लेक्चर नाही ऐकायचंय,...

Rahul Gandhi : राहुल गांधींचा अमित शाहांवर हल्लाबोल; म्हणाले, “लेक्चर नाही ऐकायचंय, आधी…”

दिल्ली । Delhi

- Advertisement -

“आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कोणतंही भाषण किंवा लेक्चर्स ऐकण्यात अजिबात रस नाही. जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने गोळ्या झाडण्याचे आणि लाठीचार्जचे आदेश नेमके कुणी दिले, हे त्यांनी आधी स्पष्ट करावं,” अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे.

हे आदेश गृहमंत्रालयाने दिले असतील तर अमित शाह दोषी आहेत, आणि जर आदेश दिले नसतील तर ते अकार्यक्षम आहेत; त्यामुळे दोन्ही परिस्थितींत त्यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी तीव्र मागणी राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात केली. संसदेत जंतरमंतर घटनेवर केंद्रीय गृहमंत्री आपली बाजू मांडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी संसद भवनाच्या परिसरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी सरकारवर आणि गृहखात्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

राहुल गांधी म्हणाले, “मी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कालच याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्ली पोलिसांवर आणि गृहमंत्रालयावर कुणाचे नियंत्रण आहे? सिस्टिमने या निष्पाप तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते का? या प्रश्नांची उत्तरे गृहमंत्र्यांनी दिली पाहिजेत. केवळ भाष्य करून किंवा काल्पनिक गोष्टी सांगून मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवता येणार नाही.”

गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राहुल गांधी पुढे म्हणाले, “गेल्या २० दिवसांपासून गृहमंत्री गायब असल्यासारखे होते. ते संसदेत यायचे-जायचे, पण या गंभीर विषयावर काहीही बोलत नव्हते. आता शेवटी संसदेत येऊन बोलणे म्हणजे हवेतून फुगा निघून गेल्यावर पुन्हा त्यात गॅस भरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.”

पत्रकार परिषदेदरम्यान काही पत्रकारांनी मध्येच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर राहुल गांधी यांनी मीडियाच्या वर्तनावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्ही बोलत असताना २४ तास हस्तक्षेप केला जातो. मग सत्ताधाऱ्यांसमोर संपूर्ण मीडिया असा गप्प का उभा राहतो? त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस का दाखवले जात नाही? देशातील तरुण आणि विद्यार्थी या सरकारला घाबरत नाहीत, तर मीडियानेही कुणाला घाबरण्याचे कारण नाही.”

जंतरमंतरवरील आंदोलकांवर झालेला पोलिसांचा बळप्रयोग आणि त्यानंतर निर्माण झालेला राजकीय वाद यामुळे संसदेतील वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांच्या या थेट राजीनाम्याच्या मागणीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...