Monday, July 27, 2026
Homeराजकीय…तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही'; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज

…तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही’; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज

मुंबई । Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक याद्यांमधील गोंधळाचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच असं आव्हान त्यांनी गोरेगावमध्ये पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दिलं आहे. महाराष्ट्रात जे मतदान होईल ते खरं होईल त्याच दृष्टीकोनातून निवडणूक झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं आहे.

“निवडणूक यादीत खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहे. पण जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच. निवडणुका शांतेतेने पार पाडायच्या असतील तर आधी मतदार यादी स्वच्छ करा,” असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

Rahata : पाणी सोडण्याचे नगर-नाशिकचे संकट टळणार

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुरामुळे जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा काल सायंकाळी 52.74 टक्के इतका झाला. काल...