Thursday, June 4, 2026
HomeराजकीयRaj Thackeray : राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर; भारत-पाक सामन्यावर...

Raj Thackeray : राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर; भारत-पाक सामन्यावर नेमकं काय म्हटलं?

मुंबई । Mumbai

आशिया चषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला असला तरी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या सामन्यावरून केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळवल्याबद्दल त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर व्यंगचित्रातून आयसीसी आणि गृह मंत्रालयावर भाष्य करण्यात आलं आहे. नक्की कोण जिंकला? आणि नक्की कोण हरलं? असा प्रश्न व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी विचारला आहे. या व्यंगचित्रात गृहमंत्री अमित शाह आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भारतीय या व्यंगचित्रात आहेत…या व्यंगचित्रात अरे बाबांना उठा! आपण जिंकलो पाकिस्तानी हरले…असं आयसीसी (जय शहा) आणि गृह मंत्रालय(अमित शहा ) त्यांना सांगत आहे.

पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात तणावाचे वातावरण असतानाही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजित केल्याने अनेक देशवासीयांनी नाराजी व्यक्त केली होती. सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी बीसीसीआयला परवानगी दिली असली तरी, देशातील अनेक क्रिकेट चाहत्यांनी आणि नागरिकांनी पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी भावना व्यक्त केली होती. देशभरातून येणाऱ्या याच प्रतिक्रियांचा संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र काढले आहे.

पहलगाम हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध आधीच ताणलेले असताना, अशा परिस्थितीत क्रिकेट सामना खेळवणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून विचारला आहे. त्यांनी व्यंगचित्रातून आयसीसी (ICC) आणि गृह मंत्रालयाला (Home Ministry) थेट लक्ष्य केले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी केवळ क्रिकेटच्या विजयावर नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा आणि राजकीय नैतिकतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचा मूळ उद्देश हा आहे की, जेव्हा आपले जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद होतात, तेव्हा क्रिकेटच्या विजयाचा आनंद साजरा करणे कितपत योग्य आहे? या विजयापेक्षा देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे, असे त्यांना सुचवायचे आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारण यांचा संबंध किती गुंतागुंतीचा आहे, हे दिसून आले आहे. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घोटी पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड; दीड...

0
घोटी | Ghoti इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) खैरगाव शिवारात मोराच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना...