Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरोहित-विराटनंतर आता 'या' अष्टपैलू खेळाडूचाही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'रामराम'

रोहित-विराटनंतर आता ‘या’ अष्टपैलू खेळाडूचाही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘रामराम’

मुबंई | Mumbai

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

त्यानंतर आता या यादीत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचेही (Ravindra Jadeja) नाव जोडले गेले असून त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो वनडे आणि कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर तीन महान भारतीय क्रिकेटपटूंनी या फॉरमॅटला अलविदा केला आहे.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच ‘टीम इंडिया’ मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी रक्कम

जडेजाने इन्स्टाग्रामवर (Instagram) टी-२० विश्वचषक २०२४ च्या ट्रॉफीसह फोटो पोस्ट करत ही मोठी घोषणा केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “माझ्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद! मी टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा म्हणत आहे.अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे मी माझ्या देशासाठी नेहमीच १०० टक्के दिले आहेत आणि देत राहीन. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न जे आता सत्यात उतरले आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या आठवणी आणि अतुलनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद” असे त्याने म्हटले आहे.

हे देखील वाचा : ICC T-20 World Cup-2024 : IND Vs SA : भारतीय संघ विश्वविजेता

रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्द

रवींद्र जडेजा पहिल्यांदा टी-२० विश्वचषक २००९ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहिला. या अष्टपैलू खेळाडूने ७४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.ज्यामध्ये एक फलंदाज म्हणून त्याने २१.४६ च्या सरासरीने आणि १२७.१६ च्या स्ट्राईक रेटने ५१५ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, रवींद्र जडेजाने भारतासाठी गोलंदाज म्हणून टी-२० सामन्यांमध्ये ७.६२ इकॉनॉमी आणि २९.८५ च्या सरासरीने ५४ बळी घेतले. तर टी-२० क्रिकेटमध्ये ४६ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना ‘एस. एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...