भारत आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे. राजधानी दिल्लीतील राजपथावरच्या संचलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आले. फक्त देशच नव्हे तर जगालाही भारतच्या शक्तीचे दर्शन घडणार आहे. संपूर्ण देशाला दरवर्षी आजच्या दिवसाची उत्सुकता लागलेली असते.