दिल्ली | Delhi
देशाची राजधानी दिल्लीत (Delhi Fire) एक मोठी दुर्घटना घडली आहे. दिल्लीतील गोकलपुरी (Gokalpuri)येथे लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ६० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहे. मात्र ही आग कशी लागली, याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही.
अग्निशमन दलानं (Delhi Fire Brigade) दिलेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवार) रात्री उशिरा ही घटना घडलीय. गोकुळपुरीत आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर माहिती मिळताच तात्काळ पथकं घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन विभागाने घटनास्थळावरून ७ मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच या आगीत ६० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.”सकाळी ही दुःखद बातमी ऐकली. मी घटनास्थळी जाईन आणि बाधित लोकांना वैयक्तिकरित्या भेटेन,” असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.