Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकांद्याच्या प्रश्नावर उपसमिती गठीत

कांद्याच्या प्रश्नावर उपसमिती गठीत

१५ दिवसात शिफारशींसह अहवाल सादर करण्याची सूचना

- Advertisement -

मुंबई | उद्धव ढगे पाटील Mumbai

कांदा दर घसरणीच्या परिस्थितीची कारणमीमांसा तसेच मागील सात-आठ वर्षात केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरण आणि त्याचा कांदा बाजारावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करून आकडेवारीसह तपशील सादर करण्यासाठी राज्य सरकारने सचिव स्तरीय समिती अंतर्गत उपसमिती गठीत केली आहे. सहकार आणि पणन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. या समितीला शिफारशींसह अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कांद्याबाबत सर्वंकष तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी २३ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयान्वये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत सहकार, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त हे सदस्य आहेत. राज्य कृषी आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक हे समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीला कांदा पिकाबाबत करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजना सूचवायच्या होत्या. मात्र, समितीला अहवाल देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर अहवाल सादर करण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली आहे.

या समितीत सदस्य म्हणून माजी कुलगुरू डाॅ. किसनराव लवांडे, निवृत्त पणन संचालक सुनील पवार,इंडो व्हेजिटेबल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सारंग निर्मल, आठवडी बाजारचे प्रवर्तक नरेंद्र पवार यांचा समावेश आहे. तर पणन संचालक शरद जरे हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

उपसमितीची कार्यकक्षा
कृषी विद्यापीठांनी तयार केलेला चांगल्या प्रतीचा कांदा, मूल्य साखळीत कसा आणता येईल याचा सविस्तर अहवाल देणे, कांदा दर घसरण, उच्च तापमानातील साठवणुकीचे तपशील, त्यापासून होणारे फायदे आणि खर्च रचना यांचा उत्पादन खर्चावरील परिणाम, कांद्यापासून उपउत्पादनाबाबत अहवाल देणे. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेल्या कांदा साठवणूक केंद्राला भेट देऊन अहवाल देण्याची जबाबदारी समितीवर सोपवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...