Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

गेले चार आठवडे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. राज्य विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन ३० जून २०२५ पासून सुरु होईल, अशी घोषणा यावेळी दोन्ही सभागृहात करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती रॅम शिंदे यांनी अधिवेशन संस्थगित झाल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

३ मार्चपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचा सन २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. अधिवेशनात एकूण १६ दिवस कामकाज चालले. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. याच अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

ताज्या बातम्या

Sharad Pawar : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा युवाशक्तीचा विजय – शरद...

0
मुंबई | Mumbai 'बहुचर्चित 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या तीव्र असंतोषामुळे अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला...