Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रएल्गार परिषद प्रकरणी तिघेजण ताब्यात

एल्गार परिषद प्रकरणी तिघेजण ताब्यात

पुणे | Pune

पुण्यातील शनिवार वाड्यासमोर २०१७ मध्ये झालेल्या एल्गार परिषदेनंतर झालेल्या भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी…

- Advertisement -

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी तीन जणांना अटक केली असून हे तिघेही पुण्यातील कबीर कला मंचचे कलाकार आहेत.

सागर गोरखे, रमेश गायचोर व ज्योती जगताप अशी या तिघांची नावं आहेत. त्यांच्यावर माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप असून, एल्गार परिषद आयोजित करण्यात आलेल्या समितीचे सक्रिय सदस्य असल्याचं म्हटलं आहे.

सागर गोरखे, रमेश गायचोर व ज्योती जगताप अशी त्यांची नावं आहेत. मागील काही दिवसांपासून गोरखे आणि गायचोर यांना एनआयएकडून मुंबईला चौकशीसाठी बोलवलं जात होतं. त्यानंतर सोमवारी (८ सप्टेंबर) त्यांना अटक करण्यात आली,’ अशी माहिती संशयितांचे वकील मिहीर देसाई यांनी सांगितलं.

पुण्यात २०१७ मध्ये शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहेत. सध्या प्रकरणात त्यावेळी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज एनआयएनं आणखी तिघांना पुण्यात अटक केली आहे.

एल्गार परिषद’ संबंधित दाखल गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांनी देशभरातून नऊ लोकांना अटक केली व एकूण २३ जणांना आरोपी केले होते. यात गोरखे आणि गायचोर यांचीही नावं होती. हे सर्व आरोपी प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

तसेच प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार माओवाद्यांचे पैसे वापरून एल्गार परिषद आयोजित केल्याचाही आरोपही पोलिसांनी केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या