मुंबई ।
- Advertisement -
आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त राज्यात तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये तसेच दहीहंडीचा मोठा उत्साह पहायला मिळाला . शेकडो गोविंदा पथकांनी दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला होता . मात्र या उत्सवात गालबोट लागत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गोविंदा जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुर आहेत.
मानखुर्दमध्ये हंडीचा दोर बांधताना तोल जाऊन ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरण चौधरी असं नाव आहे. तर गावदेवी गोविंदा पथकातील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. रोहन वाळवी असं या गोविंदाचं नाव आहे.





