Thursday, May 15, 2025
HomeराजकीयUdayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले...

Udayanraje Bhosale : वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसले यांनी मांडली भूमिका; म्हणाले…

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सुरू झालेला वाद आणखीनच पेटला असून, या प्रकरणावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

यासाठी त्यांनी ३१ मेपर्यंतची मुदतही दिली होती. मात्र, या मागणीला विरोध होत असून, वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले असून, योग्य तो निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची समिती नेमण्याची मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी करत या संदर्भात राज्य सरकारला ३१ मेपर्यंत निर्णय घ्यावा, असा आग्रह धरला आहे. मात्र, त्यांच्या या मागणीला धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी कडाडून विरोध दर्शवला. या वादानंतर वेगवेगळ्या इतिहासकारांनी आणि सामाजिक नेत्यांनी यावर आपली मतं मांडली आहेत.

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी इतिहासकारांची एक समिती नेमली जावी. ही समिती चौकशी करून समाधीबाबत सत्यता तपासून निर्णय घेईल. “इतिहासात वाघ्या कुत्र्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे या समाधीबाबत अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा,” असे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या सन्मानासाठी विशेष कायदा करण्याची गरज असल्याचे सांगितले. “आज समाजात विकृती वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी तातडीने विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. मी याआधीच विशेष कायद्याची मागणी केली होती, मात्र अद्याप तो कायदा झालेला नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तातडीने हे विधेयक मंजूर करावे,” असे ते म्हणाले.

माध्यम प्रतिनिधींनी उदयनराजे भोसले यांना वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत थेट प्रश्न विचारला असता, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “वाघ्या, वाघ्या, कोण वाघ्या? येथे एकच वाघ होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे. मग ती समाधी कधी आली? का आली? याचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा.”

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उदयनराजे भोसले यांनी समिती नेमून सत्यता शोधण्याचा सल्ला दिला आहे. इतिहासकार आणि सामाजिक नेते या विषयावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी विशेष कायद्याबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...