मुंबई | Mumbai
मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचे चित्र आहे. राज्यातील काही ठिकाणी आजपासून पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे…
अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजाला (Farmer) अश्रू अनावर झाले आहेत. राज्यात आजपासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे, नाशिक, नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Rain Updates) शक्यता आहे.
बॉलिवूडवर शोककळा! दिग्दर्शक प्रदीप सरकार काळाच्या पडद्याआड
तसेच सोलापूर जिल्ह्यासह विदर्भावर अधिक परिणाम होणार आजे. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
डरो मत! राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत