Monday, April 20, 2026
Homeभविष्यवेधमुख्य प्रवेशद्वाराबाबत कोणते नियम पाळा ?

मुख्य प्रवेशद्वाराबाबत कोणते नियम पाळा ?

असे म्हटले जाते की वास्तू नेहमी तथास्तु म्हणतो. प्रत्येक वास्तू प्रत्येकाला आपापल्या परीने आशीर्वाद देते. अनेक लोक वास्तू दोष दूर करण्यासाठी काही आवश्यक उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे घरातील मुख्य दरवाजाही तितकाच महत्त्वाचा आहे.

  • मुख्य दरवाजा घराच्या इतर खोल्यांपेक्षा मोठा असावा.
  • घरासमोर वाहणारे पाणी नसावे. असे झाल्यावर कुटुंबाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
  • घरासमोर रस्ता किंवा मंदिर असल्यास घराच्या दारासमोर जास्त जागा सोडा फायदा होईल.
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खांब असेल तर त्या घरातील महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • घराच्या मुख्य दरवाजासमोर मोठे झाड असल्यास लहान मुलांना त्रास होतो.
  • घराच्या मुख्य दरवाजासमोर रस्ता असल्यास फारसा फायदा होत नाही. तसे असेल तर घरच्या मंडळींच्या विकासाला खीळ बसते.
  • घराचा मुख्य दरवाजा नेहमी ईशान्य, उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा. या दिशा शुभ मानल्या जातात.
  • घराचा मुख्य दरवाजा जर लाकडाचा असेल तर घरात सुख-शांती कायम राहते. पण, यासाठी चांगल्या दर्जाचे लाकूड वापरावे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लिफ्ट कोसळून चार जण जखमी; पोलिस ठाण्यात...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road जेलरोड परिसरातील (Jail Road Area) राहुल नगर या ठिकाणी असलेल्या पारा अव्हेन्यू सोसायटीमध्ये एक लिफ्ट तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात...