जळगाव – प्रतिनिधी –
वरणगाव येथून नेपाळ येथे जाणाऱ्या भाविकांची बस नदीत पडल्याने अपघात
१४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वरणगाव तळवेल परिसरातील भाविक दर्शनासाठी गेले होते पोखरा येथून काठमांडूला जाण्यासाठी लक्झरी बस मध्ये जात असताना लक्झरी बस नदीत कोसळून 14 जण जागीच ठार झाले आहे तर 17 जणांना वाचवण्यात यश आल्याचे वृत्त हाती येत आहे. यातील काही भावीक बेपत्ता असल्याचे सुद्धा समजते मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
त्या घटनेमुळे वरणगाव परिसरामध्ये अतिशय चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
बस नदीत पडल्याने वरणगाव येथील १४ भाविकांचा मृत्यू
ताज्या बातम्या
Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...




